शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनजमिनी शोधण्यासाठी ‘एसआयटी’ला ६० दिवसांची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:25 IST

महसूल विभागाने नियम वेशीवर टांगून वाटप केलेल्या वनजमिनींचा शोध ‘एसआयटी’ घेणार आहे.

अमरावती : महसूल विभागाने नियम वेशीवर टांगून वाटप केलेल्या वनजमिनींचा शोध ‘एसआयटी’ घेणार आहे. या समितीला ६० दिवसांत गिळंकृत झालेल्या वनजमिनीचा अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहे. याशिवाय ‘एसआयटी’ वाटप झालेल्या वनजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास महसूल विभाग अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

वन (संवर्धन) अधिनियम १९८० हा कायदा येण्यापूर्वी ‘महसूल’ने मोठ्या प्रमाणात वनजमिनी वनेतर कामासाठी वळत्या केल्या आहेत. वाटप केलेल्या वनजमिनीवर शेती, फॉर्म हाऊस, अपार्टमेंट, इमारती उभ्या झालेल्या आहेत. ज्या उद्देशाने वनजमिनी वाटप झाल्यात, त्याला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येते. सन २०१६ पासून महसूल विभागाने चालढकल केल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सक्ती दाखविल्याने अखेर राज्य शासनाला ‘एसआयटी’चे गठन करावे लागले. या समितीला १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत शिफारशींसह सूक्ष्म अहवाल शासनाकडे सादर करण्याची ‘डेडलाइन’ आहे.

महसूल विभाग अडचणीत येण्याची शक्यता?

१९८० पूर्वी महसूल विभाग अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वनजमिनींचे वाटप केले आहे. या जमिनींचा वैधानिक दर्जा काढण्याची जबाबदारी महसूल विभागाची होती. मात्र, गत ४५ वर्षांनंतरही वाटप केलेल्या वनजमिनींचा दर्जा हा राखीव आणि संरक्षित वने असा कायम आहे. त्यावेळी एका कागदावर वनजमिनी वाटप झालेल्या असून, फेरफार झालेल्या नाहीत. ‘एसआयटी’ याचीदेखील चौकशी करणार असल्याने महसूल विभाग आता अडचणीत आलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक ३०१/२००८ दि. १५ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महसूल’ने इतर कामांसाठी वाटप केलेले वनक्षेत्र वन विभागाच्या ताब्यात देणे, हे वनक्षेत्र देणे शक्य नसल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधिताकडून मूल्य वसूल करून सदर वनक्षेत्राचा वैधानिक दर्जात बदल केल्यासंदर्भात ‘एसआयटी’ राज्य शासनाला शिफारस करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होणार नाही, यासाठी गठन केले आहे.

वनजमिनींचे वाटप आणि सकारात्मकता

शासन आदेशानुसार २५ ऑक्टोबर १९८० पूर्वी महसूल विभागाने वाटप केलेल्या वनजमिनी सकारात्मकरित्या तसा दृष्टिकोन ठेवून वन विभागास परत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. असे वनक्षेत्र तातडीने वनविभागाकडे हस्तांतरण करणे शक्य आहे अथवा नाही ? याचे स्पष्टीकरण अहवालामध्ये ‘एसआयटी’ला द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती