शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण ५६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झालेली असतांंना कोरोना संसर्गही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागला ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झालेली असतांंना कोरोना संसर्गही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागला आहे. सोमवारी चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण धक्कादायक असे ५६.३५ टक्के असल्याचे नोंदविल्या गेले. यात ४१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल २३५ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे १० महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा नोंद झाले.

जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यातील कोरोनाचे संसर्गात वाढ झालेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्येची रोज उच्चांकी नोंद होत आहे. याशिवाय चाचण्यांमधील पॉझिटिव्हीटीही दिवसेनदीवस वाढतच आहे. १ फेब्रुवारीपासून अहवालात १६ ते २२ टक्कयांपर्यत पॉझिटीव्हची नोंद झाललीे असताना सोमवारी कोरोनाची रुग्णसंख्या व चाचण्यांंत पॉझिटिव्हचे प्रमाण वेगाने वाढले. त्यामुळे ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवातही नव्हे, अशी भीती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या २३,२९३ वर पोहोचली असल्याने जिल्ह्याच्या चितेंत भर पडली आहे.

राज्यात कोरोनाचे संसर्गात कमी होत असताना अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राच्या आरोग्य पथकाने रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून काही टिप्स दिल्या. प्रत्यक्षात सलग १० महिन्यांपासून आरोग्य यंत्रणाही कोरोनाविषयक कामकाजात व्यस्त असल्याने व कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने थोडी ढिलाई आल्याचे वास्तव आहे. दरम्यान कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा उपाययोजना केल्या जात आहे.

बॉक्स

असा वाढला कोरोना संसर्ग

दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी

१ फेब्रुवारी ४०५ ९२ २२.७१

२ फेब्रुवारी ७१७ ११८ १६.४५

३ फेब्रुवारी १०७१ १७९ १६.७१

४ फेब्रुवारी ९१० १५८ १७.३६

५ फेब्रुवारी ११६१ २३३ २०.०६

६ फेब्रुवारी ९५७ १९९ २०.७९

७ फेब्रुवारी ९६२ १९२ १९.९५

८ फेब्रुवारी ४१७ २३५ ५६.३५

बॉक्स

सोमवारी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासात उपचारदरम्यान एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यची संख्या ४२४ वर पोहोचली आहे तर उपचारादरम्यान बरे वाटल्याने सोमवारी ८९ रुग्णांना संक्रमनमुुक्त करण्यात आले आहे. सद्यस्थितीत २२,२६२ जण कोरोनामुक्त झालेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचे तुलनेत हे प्रमाण ९५.५७ टक्के असल्याने जिल्ह्यास एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

कोट

चाचण्यांमध्ये पॉझिटीव्हचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी या काळात संतर्क राहणे महत्वाचे आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्ट पाळणे व अंगावर दुखणे न काढता चाचणी करणे महत्वाचे आहे.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक