रद्द रेल्वे गाड्यांचे ‘रिफंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:57+5:30
मेल, एक्स्प्रेस, गिताजंली या प्रवासी गाड्यांचे रिफंड परत देण्यात येत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर रद्द गाड्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळण्यासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान रिफंड मिळत आहे. प्रवाशांचे रिफंड मिळण्यासाठी भुसावळ येथील मुख्यालयातून रक्कम पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लागू झाले. परिणामी २३ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीतील प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता या रद्द रेल्वे गाड्यांच्या तिकिटांची रक्कम परत (रिफंड) मिळत आहे. सोमवारपासून रिफंड मिळण्यास प्रारंभ झाला. रेल्वे खिडक्यांवर यामुळे एकच गर्दी उसळल्याने रेल्वे प्रशासनाने तारीखनिहाय वर्गवारी केली आहे.
मेल, एक्स्प्रेस, गिताजंली या प्रवासी गाड्यांचे रिफंड परत देण्यात येत आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर रद्द गाड्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळण्यासाठी दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान रिफंड मिळत आहे. प्रवाशांचे रिफंड मिळण्यासाठी भुसावळ येथील मुख्यालयातून रक्कम पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर दिले जाते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत रांगेत उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांचे रिफंड घेण्यासाठी उसळलेली प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रद्द गाड्यांच्या तारीखनिहाय आता प्रवासाचे तिकीट रद्द करण्याची व पैसे परतीची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली.