शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदीचा कुरेशी समाजाचा निर्णय

By admin | Updated: March 14, 2015 00:36 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करुन देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.

लोकमत विशेषगणेश वासनिक अमरावतीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करुन देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कुरेशी समाजाने १६ मार्च सोमवारपासून जनावरांची कत्तल बंद करुन मांसविक्रीवर लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यशासनाने राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचा दाखला देत गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे कळविले आहे. गोवंश हत्याबंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करताच जनावरांच्या मांसविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुरेशी समाजाने बैठक घेऊन यापुढे पशुंच्या बाजारातून बैल, गाई आणि या प्रजातीतील जनावरांची खरेदी करु नये, असे ठरविले होते. या निर्णयाची मांसविक्रेत्यांनी अंमलबजावणी करावी, यासाठी गेल्या आठवड्यात चांदूरबाजार तर शुक्रवारी बडनेऱ्यातील गुरांच्या बाजारात जाऊन अल जमेतूल कुरेशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरांची खरेदी करण्यास मज्जाव केला. मांस विक्रत्यांनी गुरांची खरेदी थांबविल्याने पशुपालकांनी विक्रीकरीता आणलेली गुरे आल्या पावली परत न्यावी लागली. गोवंश हत्याबंदी कायद्यात गुरांची हत्या किंवा मांसविक्री करताना कोणी आढळल्यास पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे. कुरेशी समाजाच्या या पुढाकाराची प्रशंसा होत आहे.