शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावरील फळबाग योजनांसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन; दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ. चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला ...

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन;

दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ.

चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला सलग फळबाग लागवडसह, बांधावरील वृक्ष लागवड, फुलपिके लागवड, नाडेप कंपोस्ट, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण इत्यादी योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी अनुदानावरील फळबागसह इतरही योजनांच्या

लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावे, असे तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड,यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.

सदर योजना ही फक्त दोन हेक्टर क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जाॅबकार्ड, माती, पाणी परीक्षण अहवाल, ग्रामसभेचा ठराव, ७/१२, ८/अ, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अल्प, अत्यल्प शेतकरी घेऊ शकतात, तसेच अनुचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, यांचा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

फळबाग लागवडकरिता संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू, इत्यादींना अनुदान देण्यात येईल, तसेच बांधावरील लागवडीसाठी सांग, बांबू, शेवगा, कडूनिंब, सोनचाफा बोर, सीताफळ, आवळा, आंबा, इत्यादींना अनुदान देय असेल. त्याचप्रमाणे फुलपिकामध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा, यासाठी अनुदान देण्यात येईल. कंपोज खत व गांडूळ खताच्या प्रत्येकी एका युनिटसाठी ११ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. विहीर पुनर्भरणकरिता १४ हजार रुपये अनुदान देय असेल. तरी निकषात बसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर, आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.

प्रस्ताव सादर करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी, संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूरबाजार यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून परदेस नोटमध्ये कळविण्यात आले आहे.

(कमी पावसात पेरणी करू नका. सध्या तालुक्यातील काही भाग वगळता, अन्य ठिकाणी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी तालुक्यातील ज्या भागात कमी पाऊस झाला आहे, येथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आपल्या परिसरात ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. -- तालुका कृषी विभाग.चांदूर बाजार.)