शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड, पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 4:29 PM

ट्विटर व फेसबुकवरील 'त्या' पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर कोतवाली, राजापेठ पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची कारवाई, जातीय तेढ

अमरावती : मागील आठवड्यातील १२ व १३ रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोर व आंदोलकांची धरपकड सुरू असताना इंटरनेट बंदी उठल्यानंतर ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला असून, ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरील पाच पोस्टप्रकरणी पाच जणांविरुद्ध भादंविच्या ५०५ (२) या गंभीर व अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तीन आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरवर तर, दोन पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या आहेत. दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्या पोस्ट करण्यात आल्या. त्यात आक्षेपार्ह फोटोदेखील पाठविण्यात आले. ट्विटरवरील तीन पोस्ट अनुक्रमे १३ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ व त्याच दिवशी सकाळी ९.२२ मिनिटांनी अपलोड करण्यात आल्या तर फेसबुकवर १५ नोव्हेंबर सकाळी ११.५७ व १९ नोव्हेंबरला दुपारी ३.४२ मिनिटांनी अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे.

ट्विटरवरील ‘त्या’ पोस्टमुळे जातीय तेढ?

ट्विटर व फेसबुकवरील त्या पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली, राजापेठ पोलिसांनी पाच अकाऊंट धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरात १२ नोव्हेंबरला दुपारनंतर निघालेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, लूटमार करण्यात आली होती. त्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरला भाजपने बंदची हाक दिली. त्यादिवशीदेखील अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला १३ नोव्हेंबरला सकाळीच संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली. इंटरनेट बंदी असताना विशिष्ट समुदायाचे नाव नमूद असलेल्या अकाैंटधारकांनी त्या दोन घटनांच्या अनुषंगाने दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने छायाचित्रे व पोस्ट प्रसारित केली.

काय आहे ५०५ (२)?

ज्या विधानांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल. समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल अशा विधानांबाबत भारतीय दंडविधानाची कलम ५०५ (२) आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड वा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर