शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्वत्र झड, धरणे ओव्हरफ्लो, पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. येथे ४,२३८ क्युसेक्स मीटर प्रति सेंकद असा विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा धरणाचे ३ गेट ५ सेंमीने उघडण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देझटामझिरीला युवक बुडाला : वरूड तालुक्यात अतिवृष्टी, दहा तालुक्यांत पावसाची सरासरी पार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २४ तासांपासून सार्वत्रिक पाऊस सुरू आहे. धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २९.७ मिमी पावसाची नोंद झाली. वरुड तालुक्यातील वरुड, शेंदूरजना घाट, लोणी, वाठोडा व राजुरा या पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या तालुक्यात सरासरी ६५.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. झटामझिरी येथे एक युवक पावसात वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने शनिवारी दिली.ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. येथे ४,२३८ क्युसेक्स मीटर प्रति सेंकद असा विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा धरणाचे ३ गेट ५ सेंमीने उघडण्यात आलेले आहे.वरुड तालुक्यात झटामझिरी येथील तलावामध्ये पोहायला गेलेला १९ वर्षीय युवक संजय कुसराम याचा तलावाच्या ओव्हरफ्लोमध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील धारणी तालुक्यात ५८७.६ मिमी, चिखलदरा ६२६.२, अमरावती ६४५.८, भातकुली ७०५.३, नांदगाव खंडेश्वर ७९३.७, चांदूर रेल्वे ५८७.२, तिवसा ५५९.७, मोर्शी ६८४.८, वरुड ७७७.५, दर्यापूर ७०७.१, अंजनगाव सुर्जी ५८४.४, अचलपूर ५३८, चांदूर बाजार ७१६.२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५९५.४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.प्रकल्प लबालबअप्पर वर्धा प्रकल्पाची १३ दारे उघडण्यात आली. या प्रकल्पात ९७.५५ टक्के जलसाठा झाला आहे. शहानूरमध्ये ९०.७९, चंद्रभागा प्रकल्पात ९२.५१, पुर्णा प्रकल्पामध्ये ८४.९०, सपन प्रकल्पात ८१.०१ टक्के जलसाठा झाला आहे. तर पंढरी मध्यम प्रकल्प १३.६९ टक्कयांवर स्थिरावला आहे.कौंडण्यपूरच्या पुलावरून पाणीतिवसा : अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे २ मीटरने उघडण्यात आल्याने वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. तिवसा तालुक्यात पावसाचा कहर पहायला मिळाला. नमस्कारी गावाला चारही बाजूने पुराने वेढा घातला आहे. या गावचा तालुक्याशी संपर्क तुटला तर वरखेड येथे एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले. कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी गेल्याने अमरावती व वर्धा जिल्हयाचा संपर्क तुटला आहे.दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यात उर्ध्व वर्धा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि वर्धा नदीला आलेला पूर यामुळे लहान नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नमस्कारी गाव हे नदी काठावर असल्याने येथील नाल्यालाही पूर आला. चारही बाजूंनी पाणी असल्याने पुराने गावाला वेढा घातला आहे. कौंडण्यपूर येथील पुलावरून शनिवार सकाळपासून पाणी जात आहे. त्यामुळे हा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे वरखेड येथील प्रल्हाद भोंडे यांच्या राहत्या घराची भिंत पडली. तहसीलदार वैभव फरतारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. मंडळ अधिकारी नंदू मधापुरे हे पूरस्थळी भेटी देत आहेत.बेंबळाला पूर, पहूर-नांदगाव मार्ग बंदनांदगाव खंडेश्वर : शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे बेंबळा नदीला पूर आला आहे. पहूर ते नांदगाव खंडेश्वर मार्गावरील पुलावरून तीन फुटांच्यावर पाणी वाहत होते. त्यामुळे हा मार्ग सकाळी ६ ते १० पर्यंत चार तास बंद पडला होता.नदीकाठच्या खोलगट शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले. सततच्या पावसामुळे पाणी साठवून राहणाऱ्या जमिनीतील कपाशीचे पीक पीवळे पडले आहे. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे, पातेगळ झाली. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीतील कपाशीच्या पिकाची पाणी पिवळे होऊन गळली असल्याचे शेतकरी पद्माकर भेंडे यांनी सांगितले.तालुक्यातील सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नुकसानीने सर्वेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.तालुक्यात शनिवार सकाळपर्यंत नांदगाव खंडेश्वर महसूल मंडळात ४१ मिमी पावसाची नोंद झाली. धानोरा गुरव ४२, दाभा ३८, माहुली चोर ४३, लोणी टाकळी ३५, पापळ ५५, मंगरूळ चव्हाळा ३०, शिवनी रसुलापुर महसूल मंडळात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस