शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

धुमसणारे शहर अन् पोलीस आयुक्तांचा 'नो रिप्लाय'

By admin | Updated: November 6, 2014 22:46 IST

अविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर

गणेश देशमुख - अमरावतीअविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे शांततेचे आवाहन करून सुरक्षिततेची हमी द्यायला हवी होती; तथापि त्यांनी हे महत्त्वाचे कर्तव्य टाळले. बुधवारी जे घडले त्याची वार्ता शहरभरात वाऱ्यासारखी पसरली. काय घडले हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. दस्तुरनगर, यशोदानगर, मोतीनगर, राजापेठ अशा जवळपासच्या भागातील अनेक मंडळी घटनास्थळी पोहोचली. घटना घडून तीन तास उलटले तरी आत्ताच घटना घडली असावी, अशा स्वरुपाची मोठी गर्दी दस्तुरनगर आणि यशोदानगर चौरस्त्यावर बुधवारी बघता येत होती. जी मंडळी घटनास्थळी जाऊ शकली नाही किंवा जाण्याच्या भानगडीत ज्यांना पडायचे नव्हते, अशा तमाम मंडळींनाही नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे होते. घरातील महिला, मुली यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने वास्तव अवगत करून घ्यावयाचे होते. अंबानगरीने यापूर्वी अशाच घटनांचे गंभीर पडसाद अनुभवले असल्यामुळे यावेळीही सामान्यांच्या काळजात अनामिक हुरहुर होती. वास्तवाची माहिती आणि सुरक्षिततेची हमी सर्वांना हवी होती. बुधवारी सुमारे पाच वाजता घडलेल्या या घटनेनंतर फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्राईम ब्रान्च, क्यूआरटी आणि चार्ली कमांडोज् पोहोचले. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख आणि क्राईम ब्रान्चचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी कुशलतेने स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर अनेक तास रस्त्यावर गर्दी असली तरीही पुन्हा अघटीत घडणार नाही याची दक्षता बाळगण्यात हे दोन्ही अधिकारी यशस्वी ठरलेत. घटनास्थळी स्थिती नियंत्रणात आलेली असताना शहरभरात मात्र अफवा आणि चर्चांना उधाण येऊ लागले. चौकाचौकांत, दुकानांवर, पानटपऱ्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांत चर्चा होत्या त्या केवळ दसुतुरनगरातील हिंसेच्याच. ज्याला जे कळले, त्याने ते सांगितले. भयंकर घटना सांगताना त्यातील 'भयंकरपणा' वाढतच गेला. सामान्यांची मने भयभीत झाली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चौकशी होऊ लागली. 'आमचे घर तिकडेच आहे, त्या रस्त्याने आता जावे की नाही', असले प्रश्न आम्हाला विचारले जाऊ लागले.