शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या निर्णयाला पक्षाचे बंधने नाहीत

By admin | Updated: August 23, 2014 02:22 IST

सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे.

अमरावती : सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे. त्यानुसार महापालिकेत २३ सदस्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट या नावाने आघाडी स्थापन केली. सर्व सदस्यांचे स्वतंत्र प्रतिज्ञापत्र घेऊन गट स्थापन करताना या गटाचे गटनेते म्हणून अविनाश मार्डीकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. हा फ्रंट निवडणुकीनंतर तयार करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी या नावाचा वापर होत असल्याचा नियम लागू होत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे गटनेता बदलविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. अविनाश मार्डीकर यांच्या जागी सुनील काळे यांची गटनेतेपदी वर्णी लावण्यात आली. गटातील कोणत्याही सदस्यांची मागणी नसताना मार्डीकर यांना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्यांनी गटनेते पदाचे अधिकार सुनील काळे यांना असल्याचे अधिकृत पत्र काढले. हेच पत्र विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले. आयुक्तांनी अविनाश मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था अपात्र नियमात बसत नसतानाही विभागीय आयुक्तांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला होता, असा आरोप खोडके यांनी केला. याबाबत मार्डीकर यांची उच्च न्यायालयात याचिका सादर करताना हे प्रकरण ‘केस लॉ’ प्रमाणे हाताळण्यासाठी प्रदीप महल्ले, अशोक जैन, जी.एम. भांगडे,किशोर शेळके यांनी सहकार्य केले. एकदा गट स्थापन झाल्यानंतर गटनेता बदलविण्याचे अधिकार पक्षाला नसून गटातील दोन तृतीयांश सदस्यांनी मागणी केली तरच गटनेता बदलण्याचे अधिकार आयुक्तांना नव्या कायद्यानुसार असल्याचे खोडके यांनी सांगितले. मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई सत्तेच्या दबावाखाली विभागीय आयुक्तांनी घेतली असली तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल, अशी आशा होती. तो विश्वास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकाल्याने सार्थकी लागल्याचे मत खोडके यांनी व्यक्त केले. मात्र विभागीय आयुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या न्याय निर्वाळ्याचे बहाल करण्यात आलेले अधिकार राजकीय दबावाखाली दिली जात असेल तर ते अधिकार काढून टाकावे, अन्यथा सदस्य ज्या भावनेने निवडणुकीला सामोरे जातो, त्याचे जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी वऱ्हाड विकास मंचच्या संस्थापक सुलभा खोडके, प्रदीप महल्ले, अशोक जैन, अविनाश मार्डीकर, किशोर शेळके, सुनील बोळे, चेतन पवार, संजय आसोले, हमीद शद्दा, जावेद मेमन, रिना नंदा, ममता आवारे, वंदना हरणे, सारिका महल्ले आदी उपस्थित होते.