शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच फुटणार नगरपंचायतींचे फटाके

By admin | Updated: September 30, 2015 00:29 IST

जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राजकीय हालचालींना वेग : नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. नगरपंचायत निवडणुकीमुळे यंदा मात्र दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत.जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापनेचा निर्णय गतवर्षी आघाडी सरकारने घेतला होता. परंतु जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारच्या काळात झाली. ९ एप्रिल रोजी नगरपंचायतींची अधिसूचना जारी होऊन ग्रामपंचायती बरखास्त झाल्यात. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी सहा महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रियेची तयारी करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्या अन्वये आॅगस्ट महिन्यात प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. साधारणपणे ५०० मतदारसंख्येचा एक प्रभाग असे १७ प्रभाग प्रत्येक नगरपंचायतीमध्ये जाहीर करण्यात आले. तेव्हापासूनच येथे राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. प्रभाग आरक्षणनिहाय उमेदवारांचा शोध घेणे, राखीव प्रभागातील उमेदवारांचे जात, वैधताप्रमाणपत्र काढणे या सोपस्कारांना गेल्या महिन्यापासून गती मिळाली आहे. नगरपंचायती स्थापित झाल्यापासून प्रामुख्याने युवा उमेदवार बाशिंग बांधून आहेत. अपक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रथमच निवडणूक होणारी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. (प्रतिनिधी)आरक्षण गुलदस्त्यात नगरपंचायतींमध्ये १७ प्रभाग आहेत. या प्रभागांची आरक्षण प्रक्रिया मागील महिन्यात पार पडली. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांद्वारा उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात असल्याने इच्छुक उमेदवारांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.संकेतस्थळावरील अर्जाने उडणार तारांबळमहाआॅनलाईनद्वारे विकसित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे सादर करावी लागणार आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा बोजवारा जगजाहीर असल्याने उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना या ‘सर्व्हर डाऊन’चा फटका बसला होता. अखेर आयोगाने पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारले होते. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाविषयी अद्याप कुठल्याही सूचना नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकी पश्चात आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.- विजय लोखंडे,प्रशासक, तिवसा नगरपंचायत.