शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पतींना मिळणार अर्थसहाय्य

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

महाराष्ट्र्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने कृषी हवामान विभागानुसार बाजारपेठ व मागणीचा विचार करुन औषधी वनस्पतीच्या ८० जाती निश्चित केल्या आहेत.

जितेंद्र दखने अमरावतीमहाराष्ट्र्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने कृषी हवामान विभागानुसार बाजारपेठ व मागणीचा विचार करुन औषधी वनस्पतीच्या ८० जाती निश्चित केल्या आहेत. या औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादन खर्चाच्या २० ते ७५ टक्के रक्कम अर्थसाह्य म्हणून दिली जाते. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वनस्पती अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेतून समूह पध्दतीने वनस्पतीची लागवड करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वैयक्तिक शेतकऱ्यालाही या योजनेत सहभाग घेता येणार असून त्याकरिता किमान अर्धा एकर क्षेत्रावर ०.२० हेक्टर लागवडीचे नियोजन करणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभार्थ्यासाठी ही योजना बँक कर्जाशी निगडित असून किमान २० टक्के कर्ज घेणे आवश्यक आहे. स्वयंम सहायता गट, मंडळ, ट्रस्ट, सहकारी संस्था यांनाही योजनेत सहभाग घेता येणार आहे. साठवण गहू प्रक्रिया केंद्र, वाढवणी गृह, तपासणी प्रयोग शाळा उभारणी, पणन प्रोत्साहन बाजारपेठ अभ्यास करार पध्दतीने शेतीच चालना, पणन सुविधा, तपासणी फी सेंद्रीय, आदर्श पीक पध्दती प्रमाणीकरण यासाठी २० ते ५० टक्के अर्थ सहाय्य करण्याची योजना कृषी विभागाकडे आहे. ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते.या वनस्पतींसाठी २० टक्के मदतबच, कोरफड, काळमेघ, शतावरी, सफेद मुसली, कडूनिंब, ब्राम्ही, पुनर्नवा, सोनामुखी, मंडूकपणी, दालचिनी, कोलीयम, रतलू, वावडिंग, कोकम, गडूमार, अनंतमुळ, कवचबीन, तुळस, आवळा, भूई आवळा, पिंगळी, मकोय, मधुपणी, स्टीव्हिया, अर्जुन, बेहडा, हिरडा, गुळवेल, अश्वगंधा, तगर, सदाबहार अर्चा या वनस्पतींसाठी २० टक्के मदत दिली जाईल.औषधी वनस्पती लागवडीसाठी जिल्ह्यात योजना राबविण्यात येते. त्याकरिता कृषी विभागामार्फत २० ते ७५ टक्के अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे. - दत्तात्रय मुळे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारीशासन शेतकऱ्यांसाठी योजना राबवित असले तरी याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांचा फायदा मिळत नाही. त्यामुळे यासाठी जागृती करण्याची गरज आहे.- अमोल कावरे, शेतकरी.