शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीप पेरणी माघारली

By admin | Updated: June 26, 2016 00:07 IST

मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या.

पाऊस नसल्याचा परिणाम : १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणीअमरावती : मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख २९ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. सद्यस्थितीत १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. क्षेत्राची ही फक्त दोन टक्केवारी आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाचे आगमन होऊन पेरणीला सुरुवात होते व जूनअखेरीस पूर्ण पेरणी होऊन जाते अशी परंपरा आहे. आता जून ऐवजी जुलै महिन्यात पेरणी सुरू होऊन आॅगस्ट महिन्यापर्यंत पेरणी सुरू राहत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ८०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे क्षेत्र सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीला अद्याप सुरुवात नाही. हवामान खात्याने २६ जूननंतर पेरणीयोग्य पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिलेला आहे व कृषी विभागाने देखील २६ जूननंतर पेरणी करावी अन्यथा दुबार पेरणीची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी धानासाठी ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना पेरणी क्षेत्र निरंक आहे. ज्वारीसाठी ३७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असताना १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. बाजरीसाठी २०० हेक्टर क्षेत्र असून पेरणी क्षेत्र निरंक आहे. मक्यासाठी १२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. पेरणीक्षेत्र निरंक आहे. तुरीसाठी १ लाख १४ हजार क्षेत्र असून २१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. उडीदासाठी ५३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. खरीप भुईमुगाचे क्षेत्र यंदा निरंक आहे. तीळ ५०० हेक्टर क्षेत्रात निरंक आहे. सूर्यफुल निरंक, सोयाबीनसाठी ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ४६०० हेक्टर क्षेत्रात सध्या पेरणी झालेली आहे. कपाशीसाठी १ लाख ९३ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. १ ते २५ जूनदरम्यान ६२.३ मि.मी. पाऊसजिल्ह्यात १ ते २५ जूनदरम्यान पावसाची अपेक्षित सरासरी ११६.८ मि. मी. आवश्यक असताना ६२.६ मि. मी. पाऊस झाला. या ५३.३ टक्केवारी आहे. ९० मि.मी. पाऊस चिखलदरा, अमरावती ४३, भातकुली ४२.२,नांदगाव ७३.३, चांदूररेल्वे ७९.६, धामणगाव ५८.३, तिवसा ८१.८, मोर्शी ४२, अचलपूर ४७.८, चांदूरबाजार ३७.६, दर्यापूर ७५.७, अंजनगाव ७३.३, धारणी ८४.१ मि. मी. पाऊस पडला आहे.कपाशी वरचढ, सोयाबीन माघारलेदरवर्षी सोयाबीनचे पेरणी क्षेत्र अधिक राहून पेरणीच टक्का अधिक असतो. यंदा मात्र उलट आहे. सोयाबीन सद्यस्थितीत ४६०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे केवळ १ टक्के पेरणी क्षेत्र आहे. याउलट कपाशीची ७ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ४ टक्के पेरणीक्षेत्र आहे.