शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वाङ्मयाची काशी रिद्धपूर!

By admin | Updated: February 27, 2016 00:13 IST

श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे.

मराठी राजभाषा दिन : लीळाचरित्रासह अनेक मराठी ग्रंथांचे लेखनसुमित हरकूट  चांदूरबाजारश्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला आहे. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.मराठी सरिता जेथे उगम झाली ती हीच पावनभूमी आहे. मराठी वाङमयाची पंढरी आहे. यामुळे प्रत्येक लेखकाने, साहित्यिकानेच नाही तर प्रत्येक मराठी माणसाने या मातीचा बुक्का मस्तकावर लावावा व या पवित्र ऐतिहासिक मातीवर आपला माथा टेकवावा, अशी ही भूमी आहे. ही माती गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तवाने पुनित झालेली आहे. महीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला. समतेचा विचार १३ व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते. ते चक्रधरांचे गुरु होते. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमितच.नागदेवाचार्यांनी लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठी भाषेतच नव्हे, तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत लिहून घेतले व बोली भाषेला शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले. संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले. वऱ्हाडी बोली आद्यग्रंथाची भाषा झाली. चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमित झाला. मराठी भाषेला त्यांनी याच भूमितून शास्त्रभाषेचा दर्जा प्राप्त करुन दिला. ही फार मोठी वाङमयीन भाषिक क्रांती होती.महानुभावांच्या १४ सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्राची क्रांती होय. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक होते. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती यात झाली. तत्त्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला.मराठी भाषेचा झेंडा पंजाब, अफगाणिस्थानापर्यंत येथूनच पोहोचला. मराठी भाषाप्रेमींनी या भूमिला मानाचा मुजरा करावा, अशी ही भूमी पवित्र आहे.२७ फेब्रुवारीला साजरा होत असलेल्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून रिद्धपूर नगरीचे हे महात्म्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी येथील संत मंडळीही सरसावली आहे. रिद्धपूरच्या मातीत मराठी वाङमयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.