शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

आदिवासी विद्यार्थी तीन महिन्यांत अधिकारी कसे होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:00 IST

तीन ते चार वर्षांच्या परिश्रमानंतरही मोजकेच प्रशासनात अधिकारी म्हणून रूजू होतात. मात्र, आदिवासी विकास विभाग यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षेकरिता आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवितात.

- गणेश वासनिकअमरावती : तीन ते चार वर्षांच्या परिश्रमानंतरही मोजकेच प्रशासनात अधिकारी म्हणून रूजू होतात. मात्र, आदिवासी विकास विभाग यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षेकरिता आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवितात. त्यामुळे हे प्रशिक्षण एनजीओंना खिरापत वाटपासाठी असून, आदिवासी विद्यार्थी तीन महिन्यांत कसे अधिकारी होणार, हा प्रश्न आ. राजू तोडसाम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.इतर संवर्गाप्रमाणे आदिवासींचादेखील प्रशासनात टक्का वाढावा, यासाठी यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षेचे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ही योजना राज्यभरात राबविली जात असून, नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या चार अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २४ प्रकल्प अधिकाºयांमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेचे स्वरूप अतिशय चांगले असले तरी तीन महिन्यांच्या यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षणाने आदिवासी विद्यार्थी काय साध्य करेल, असा सवाल आ. राजू तोडसाम यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या लक्षात आणून दिला. आदिवासी विद्यार्थी हा दºया, खोºयात, वस्ती, पाड्यावर राहत असल्याने इंग्रजी भाषेसोबत त्याचे फारसे सौख्ख्य नाही. विधिमंडळातील सचिव आणि वर्ग १ चे अधिकारी यांना विचारले असताना यूपीएससी, एमपीएसी परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे परिश्रम घेतल्यानंतर अधिकारीपदी रूजू झाल्याचे शिक्षित कुटुंबातील व्यक्ती सांगतात. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांना यूपीएसीसी, एमपीएससी पूर्वपरीक्षा तयारीसाठी तीन महिन्यांचे प्रशिक्षण कशासाठी दिले जाते, याच्या खोलात गेल्यास सत्यता बाहेर येईल, असे मत आ. तोडसाम यांनी सभागृहात मांडले. एमपीएससी, यूपीएससी पूर्वपरीक्षा प्रशिक्षण योजनेचा मोठा गाजावाजा करायचा; मात्र प्रशिक्षणाच्या नावे एनजीओ पोसायचे, हाच उपद्व्याप आजतागायत सुरू असल्याचा गंभीर आरोप आ. तोडसाम यांनी केला. विद्यार्थी कितीही हुशार असला तरी तो तीन महिन्यांत यूपीएससी, एमपीएससी पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण घेऊन अधिकारी बनू शकत नाही, असा दावा आ. तोडसाम यांनी केला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना खरेच प्रशासनात अधिकारी म्हणून सेवा देताना बघायचे असेल तर पूर्वपरीक्षेचा कालावधी वाढवून तीन महिन्यांऐवजी एक वर्षाचा करावा, तसेच या याजेनसाठी ५ कोटींची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याक डे केली आहे.

यूपीएससी, एमपीएससी परीक्षा प्रशिक्षणासाठी स्वतंत्रपणे पाच कोटींची तरतूद असावी. आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य आणि मौखिक परीक्षेसाठी विशेष अनुदान मिळावे. त्यानंतर दरवर्षी ५० ते ६० विद्यार्थी वर्ग १ चे अधिकारी होतील.- राजू तोडसाम,आमदार, (आर्णी - केळापूर)

टॅग्स :Amravatiअमरावती