शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
3
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
4
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
5
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
6
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
7
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
8
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
9
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
10
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
11
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
12
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
13
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
14
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
15
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
16
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
17
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
18
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
19
सकाळी उठल्यावर परत परत झोपावेसे वाटते? शिवानी दीदी सांगताहेत उपाय!
20
"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर

महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:14 AM

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती ...

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या

धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तालुक्यातील ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांना विसर पडला. १९ फेब्रुवारी रोजी या कार्यालयांमध्ये केवळ कागदावरच जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी राज्य शासन व जिल्हा केली आहे.

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. कोविड-१९ च्या काळात हा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित करायचा, याबाबतीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परिपत्रक काढून सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या होत्या. स्वच्छता अभियानासारखे उपक्रम गावोगावी राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत व महसूल विभागाला दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महापुरुष जयंतीच्या यादीत असतांना ग्रामपंचायत, शाळा, तलाठी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक तसेच तलाठी जयंतीला कार्यालयात आलेच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रत्येक गावातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांवर आपापल्या मुख्यालयी हजर राहून, कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील नियमांना अधीन राहून जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असताना, केवळ कागदोपत्री ही जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव भैसे यांनी जिल्हा परिषद तसेच राज्याच्या ग्रामीण विकास व महसूल खात्याकडे केली आहे. ज्या कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात आली नाही, त्या संबंधित ग्रामसेवक तथा तलाठी तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी भैसे यांनी आपल्या तक्रारीतून राज्य शासनाकडे केली आहे

मी स्वतः अनेक ग्रा.प. सरपंच- उपसरपंचना फोनद्वारे याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायत मध्ये सचिवांची तलाठी कार्यालयात तलाठी व शाळांमध्ये मुख्याध्यापकांची गैरहजेरी होतीमहाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या जयंतीबाबत अशा प्रकारची अनास्था बाळगणाऱ्या

या संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे

विजय भैसे

माजी जी प अध्यक्ष, अमरावती