शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मंजुरीची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST

अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्टांनुसार जिल्ह्यातील सर्व बेघर व्यक्तींना घरे मिळवून देण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करून ३१ मार्चपूर्वी ...

अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्टांनुसार जिल्ह्यातील सर्व बेघर व्यक्तींना घरे मिळवून देण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे करून ३१ मार्चपूर्वी घरकुल मंजुरी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी यंत्रणेला दिले. बेघरांना घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील आवास योजनेच्या कामांचा ना. ठाकूर यांनी 'व्हीसी'च्या माध्यमातून आढावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती व सदस्य तसेच गटविकास अधिकारी यांनी यात सहभाग घेतला.

आवास योजनेच्या माध्यमातून वंचितांना घराचा लाभ मिळवून देता येणे शक्य आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्याची कामगिरी तितकीशी समाधानकारक दिसत नाही. येत्या पंधरवड्यात ही स्थिती सुधारली पाहिजे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती यंत्रणेतील पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी गावोगावी भेटी देऊन गरजू नागरिकांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

बॉक्स

रोज दोन हजार घरकुले मंजूर करा

सीईओ, प्रकल्प संचालक, बीडीओ, ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रोज किमान दोन हजार घरकुले मंजूर करून घ्यावी. गावठाणात जागा नसलेल्या व्यक्तींना जागा मिळवून देत त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. घरासाठी जागा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील १४ हजार नागरिकांनी आवास योजनेत अर्ज केले आहेत. त्यांना शक्य त्या पर्यायाचा अवलंब करून जागा मिळवून देणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाल्या.

बॉक्स

कुचराई झाल्यास प्रशासकीय कारवाई

जी अतिक्रमणे नियमानुकूल झालेली नाहीत, त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून नियमानुकूल करून घ्यावी. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के प्रकरणे निकाली काढावी व घरकुले मंजूर करावी. यामध्ये कुचराई केल्यास गटविकास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.