शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

शेतकऱ्यांनो जमिनीची घ्या काळजी ! युरियाचा अतिवापर जमिनीसाठी ठरतोय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:28 IST

खराब : पाण्यातही आढळला नायट्रेटचा अंश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वस्त रासायनिक खत असल्याने युरियाचा अनिर्बंध वापर सध्या खरीप, रब्बी व बागायती पिकांसाठी होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत असताना पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासदेखील घातक आहे.

युरियाचा अनिर्बंध वापर सध्या पिकांसाठी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. युरियामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळेच युरियाचा वापर वाढला आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज आहे. केवळ युरियाच नव्हे तर डीएपीसह अनेक रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. युरिया जमिनीत मुरल्यानंतर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते व नदी, नाले, विहिरी, कूपनलिकांमधील पाण्यात मिसळले जाते व पिण्याच्या पाण्याद्वारे नायट्रेट शरीरात जात असल्याने मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मानवी आरोग्यावर होतात परिणामपिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आल्यास व हे पाणी लहान मुले, गर्भवती महिलांच्या पिण्यात आले तर अशा पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे आरोग्य विभागाने सांगितले.

पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढतेपिण्याच्या पाण्यात युरियामुळे नायट्रेट मिसळले जाते. या पाण्यामध्ये नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. पाणी परीक्षण प्रयोगशाळांच्या अहवालानुसार काही पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे ६० ते ८० मिली ग्रॅमपर्यंत आढळले आहे. त्यामुळे युरियाचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे. दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यासह अनेक आजार होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले

"युरियापेक्षा द्रवरूप नॅनो युरिया वापरल्यास धोका कमी होतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये दाणेदार युरियाचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे धोक्याचे प्रमाणदेखील वाढतच असल्याने कृषी विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे."- प्रवीण राऊत, शेतकरी 

टॅग्स :FertilizerखतेfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती