शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
6
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
9
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
10
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
11
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
12
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
13
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
14
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
15
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
17
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
18
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
19
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
20
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

शेतकऱ्यांनो जमिनीची घ्या काळजी ! युरियाचा अतिवापर जमिनीसाठी ठरतोय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:28 IST

खराब : पाण्यातही आढळला नायट्रेटचा अंश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वस्त रासायनिक खत असल्याने युरियाचा अनिर्बंध वापर सध्या खरीप, रब्बी व बागायती पिकांसाठी होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत असताना पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासदेखील घातक आहे.

युरियाचा अनिर्बंध वापर सध्या पिकांसाठी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. युरियामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळेच युरियाचा वापर वाढला आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज आहे. केवळ युरियाच नव्हे तर डीएपीसह अनेक रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. युरिया जमिनीत मुरल्यानंतर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते व नदी, नाले, विहिरी, कूपनलिकांमधील पाण्यात मिसळले जाते व पिण्याच्या पाण्याद्वारे नायट्रेट शरीरात जात असल्याने मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मानवी आरोग्यावर होतात परिणामपिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आल्यास व हे पाणी लहान मुले, गर्भवती महिलांच्या पिण्यात आले तर अशा पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे आरोग्य विभागाने सांगितले.

पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढतेपिण्याच्या पाण्यात युरियामुळे नायट्रेट मिसळले जाते. या पाण्यामध्ये नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. पाणी परीक्षण प्रयोगशाळांच्या अहवालानुसार काही पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे ६० ते ८० मिली ग्रॅमपर्यंत आढळले आहे. त्यामुळे युरियाचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे. दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यासह अनेक आजार होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले

"युरियापेक्षा द्रवरूप नॅनो युरिया वापरल्यास धोका कमी होतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये दाणेदार युरियाचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे धोक्याचे प्रमाणदेखील वाढतच असल्याने कृषी विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे."- प्रवीण राऊत, शेतकरी 

टॅग्स :FertilizerखतेfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती