शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शेतकऱ्यांनो जमिनीची घ्या काळजी ! युरियाचा अतिवापर जमिनीसाठी ठरतोय घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:28 IST

खराब : पाण्यातही आढळला नायट्रेटचा अंश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वस्त रासायनिक खत असल्याने युरियाचा अनिर्बंध वापर सध्या खरीप, रब्बी व बागायती पिकांसाठी होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत असताना पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासदेखील घातक आहे.

युरियाचा अनिर्बंध वापर सध्या पिकांसाठी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. युरियामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळेच युरियाचा वापर वाढला आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज आहे. केवळ युरियाच नव्हे तर डीएपीसह अनेक रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. युरिया जमिनीत मुरल्यानंतर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते व नदी, नाले, विहिरी, कूपनलिकांमधील पाण्यात मिसळले जाते व पिण्याच्या पाण्याद्वारे नायट्रेट शरीरात जात असल्याने मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मानवी आरोग्यावर होतात परिणामपिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आल्यास व हे पाणी लहान मुले, गर्भवती महिलांच्या पिण्यात आले तर अशा पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे आरोग्य विभागाने सांगितले.

पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढतेपिण्याच्या पाण्यात युरियामुळे नायट्रेट मिसळले जाते. या पाण्यामध्ये नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. पाणी परीक्षण प्रयोगशाळांच्या अहवालानुसार काही पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे ६० ते ८० मिली ग्रॅमपर्यंत आढळले आहे. त्यामुळे युरियाचा अतिवापर टाळणे महत्त्वाचे आहे. दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यासह अनेक आजार होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले

"युरियापेक्षा द्रवरूप नॅनो युरिया वापरल्यास धोका कमी होतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये दाणेदार युरियाचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे धोक्याचे प्रमाणदेखील वाढतच असल्याने कृषी विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे."- प्रवीण राऊत, शेतकरी 

टॅग्स :FertilizerखतेfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती