शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

कार्यकारी अभियंत्याच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:26 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीकरिता वर्धा नदीत पाणी सोडण्याचे विनापरवानगी आदेश कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिलेत. या नियमबाह्य प्रकाराची अधीक्षक अभियंता अनिल बहादुुरे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील, अशी माहिती सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देरवींद्र लांडेकर : एसई चौकशी अधिकारी, १५ दिवसात देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीकरिता वर्धा नदीत पाणी सोडण्याचे विनापरवानगी आदेश कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिलेत. या नियमबाह्य प्रकाराची अधीक्षक अभियंता अनिल बहादुुरे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील, अशी माहिती सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.सिंचन भवनातील बैठकीमध्ये जो प्रकार आमदार यशोमती ठाकूर यांनी केला, हा दबावतंत्राचा प्रकार आहे. तिवसा नगरपंचायतीची डिमांडच नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने दबावात येऊन ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले व त्यानंतर डिमांड घेण्यात आली. आ. ठाकूर यांनी पाणी सोडण्यासाठी दबाव आणून एवढा बाऊ केला, सिंचन विभागाला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप लांडेकर यांनी केला.यावर्षी धरणातील १८५ एमएमएक्यू पाणी वापरले गेले, जे कधीच वापरले जात नाही. मात्र, परिस्थितीच अशी उद्भवली आहे. तिवसा नगरपंचायतीचे अ‍ॅग्रिमेंटदेखील योग्य नाही. पाणी वाहून नेण्यासाठी त्यांच्याजवळ पाइप लाइन नाही, दबावात येऊन पाणी सोडण्यात आले. मुळात तिवसा येथील मागणीच नाही. आ. ठाकूर यांचे तिवस्याकरिता पाणी सोडण्याचे पत्रदेखील नाही. त्यांचे पत्र मतदारसंघातील पाणीटंचाईच्या गावांसाठी आहे आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अखत्यारीतील ती बाब आहे. मला विश्वासात न घेता परस्पर कार्यकारी अभियंत्यांनी हा निर्णय घेतला. हा नियमबाह्य प्रकार आपण थांबविला, अशी माहिती लांडेकर यांनी दिली. आमदारांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी संघटना जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे ते म्हणाले.काळ्या फिती लावून कामकाजसिंचन भवनातील बैठकीमध्ये आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. लांडेकर यांनीही काळी फीत लावून पत्रकार परिषद घेतली.जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आधिकार नाहीतऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील पाणी सोडण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल नाहीत. यासंदर्भात त्यांचे कुठलेही पत्र नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांचा आदेश डावलला नसल्याचे लांडेकर म्हणाले. जिल्हाधिकाºयांकडून पिण्याच्या पाण्याच्या परिमाणाची मागणी आल्यावर अधीक्षक अभियंत्याद्वारे ती विदर्भ पाटबंधारे विभागाला सादर करावी लागते. त्यानंतर महामंडळाद्वारे याविषयी आदेशित करण्यात येते, असे ते म्हणाले.होय, मी आमदार बोंडेंचा नातेवाईकआपण आमदार बोंडेंचे नातेवाईक आहोत, असे रवींद्र लांडेकर म्हणाले. आ. अनिल बोंडे यांनी ऊर्ध्व वर्र्धाचे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती फोनद्वारे दिली. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यांचा हा निर्णय नियमबाह्य असल्याने आपणच पाणी थांबविण्याचे सांगितले. मी पुण्यात असल्याने सकाळी आल्यावर निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे लांडेकर म्हणाले.पाणी सोडण्यासाठी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्याचा फोनतिवसा येथे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकाºयांद्वारे आरक्षित पाणी सोडले जावे, असा फोन तिवसा नगरपंचायत कर्मचाºयाकडून आला होता. त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे म्हणाले. त्यांनी अधीक्षक अभियंत्याचे अधिकार वापरले, जे सध्या लद्दाखमध्ये आहेत. मीदेखील पुण्याला होतो. आमचा कार्यकारी अभियंता फेल ठरला. त्यांनी संबंधित गावांमध्ये दवंडी दिल्यानेच गोंधळ झाल्याचे लांडेकर म्हणाले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई