शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख मतदारांनी मतदानाकडे फिरविली पाठ

By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आठ मतदारसंघ मिळून असलेल्या एकूण २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी १४ लाख २२ हजार ८५७ मतदारांनीच

अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आठ मतदारसंघ मिळून असलेल्या एकूण २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी १४ लाख २२ हजार ८५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ७ लाख ९८ हजार ७६६ मतदारांनी मतदानाला खो दिला असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळदरम्यान मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत आठही विधानसभा मतदारसंघात १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या भाग्याचा अंतिम निर्णय रविवार मतमोजणीतून दिसून येणार आहे.जिल्ह्यात आठही मतदान संघांकरिता बुधवारी (१५ आॅक्टोबर) मतदान पार पडले. ७ लाख ७८ हजार २६१ पुरुष व ६लाख ४४ हजार ५९२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत दोनने वाढ झाली. बुधवारी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ६ वाजताची वेळ असताना मेळघाट मतदारसंघातील चार केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. यावर्षी मतदारसंघामध्ये मतदाना संदर्भात उत्सुकता दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदान २ टक्क्यांनी वाढले असले तरी प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे कोण आघाडीवर राहील हे संभ्रम निकालानंतरच दूर होईल. सर्वाधिक मतदान यावेळी अचलपूर मतदार संघात आहे. येथे ७०.३७ टक्के मतदान झाले आहेत. यावेळी जिल्ह्यात २२ लाख २१ हजार ६२३ मतदार असताना १४ लाख २२ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानामध्ये ६७ टक्के पुरुषांनी तर ६० टक्के महिलांनी मतदान केल्याची नोंद आहे. यामध्ये चार तृतीपंथीचादेखील समावेश आहे. मतदानाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ६४.११ इतकी आहे. यामध्ये सर्वात कमी मतदान हे अमरावती मतदारसंघात झाले आहे. येथे ५५.७४ टक्के मतदानाची नोंद असून त्या पाठोपाठ बडनेरा मतदारसंघात ५६.०८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मेळघाट मतदानात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी अचलपूर मतदारसंघात व्हीव्हीपॅटचा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने येथे मतदानाची टक्केवारी वाढल्याची चर्चा आहे.