शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:37 IST

आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

गजानन मोहोड

अमरावती : सततचा पाऊस अतिवृष्टी, नदीनाल्यांना पूर, रस्ते चिखलात व वारंवार सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष यामुळे राज्यात १.६९ कोटी हेक्टरपैकी ८१.०४ लाख हेक्टर क्षेत्रात म्हणजेच ४७.८९ टक्के क्षेत्रात १४ सप्टेंबरपर्यंत मोबाइल ॲपने पीक पेरा नोंदविण्यात आला. या कालावधीत ६० टक्के नोंद अपेक्षित आहे. आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाने शेतमालाची विक्री करावयाची असल्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर पिकांची ई-पीक पाहणी आवश्यक आहे.

याशिवाय शासनाने आता पीक विमा, पीक कर्ज, शासन अनुदान वाटप आदींसाठी ई-पीक पाहणी आवश्यक केली आहे. पिकांचा ऑनलाइन पेरा नोंदीशिवाय शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ मिळत नाही.

लागवडयोग्य जमिनीतून पाच गुंठ्यापर्यंत वगळणार

पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीत यंदा प्रत्येक जिल्ह्यातील ५ गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले स्वमालकीच्या शेतीक्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद शेतीक्षेत्रात होत आहे. प्रत्यक्षात इतक्या कमी क्षेत्रावर लागवड केली जात नाही. त्यामुळे असे क्षेत्र नावावर असलेले जमीनमालक ई-पीक पाहणी करत नाहीत.

भूमिअभिलेख विभागाने या क्षेत्राची जिल्हानिहाय यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे. या यादीची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीखालील क्षेत्रातून हे क्षेत्र वगळण्याचे निर्देश दिले आहेत, असेही दिवसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी