शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वरूड शहरासह तालुक्यात कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

वरूड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. दोन दिवसांत तब्बल ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. ...

वरूड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. दोन दिवसांत तब्बल ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. १ मार्च रोजीदेखील ३८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यात शहरातील १९ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा २८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता वाढली आहे. परिणामी कोरोना त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध थेट फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना अटकावासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तहसीलदार सुटीवर, तर उपविभागातील अधिकारी प्रभारी असल्याने कोरोनाबाबतचा निर्णय घ्यावा तरी कुणी, हा प्रश्न असल्याची चर्चा प्रशासनात आहे. वरूड शहरासह तालुका ‘कोरोना हॉट स्पॉट’ होत असताना, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची रजा मंजूर तरी कशी केली जाते, हा जनसामान्यांचा प्रश्न आहे. नागरिक स्वैर झाल्याने नगरपालिकेच्यावतीने आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाने एक वर्षापासून नागरिकांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी पुन्हा गत पंधरवाड्यापासून कोरोनाने तोंड वर काढले. तहसीलदार रजेवर असल्याने प्रशासन सुस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली नसल्याने निर्णय कुणी घ्यावा, हा प्रश्न आहे. उपविभागीय अधिकारीसुद्धा प्रभारी असल्याने कोरोनाकाळात पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी होत आहे.

- तर थेट फौजदारीच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा थेट फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करू, असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले. सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात, दुकानात, उपाहारगृहात, वाहनात निर्धारित संख्येपेक्षा अकारण गर्दी दिसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. शहरातील ज्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल, ते संपूर्ण घर सॅनिटाईझ केले जाईल. कंटेनमेन्ट झोन तयार करून परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना पॉझिटिव्ह आणि विलगीकरणातील नागरिक रस्त्यावर दिसल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांनी मास्कचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. ताप, सर्दी झाल्यास वेळीच विनाविलंब उपचार घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल देशमुख व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी केले आहे.

-----------