मुख्यमंत्री की राजा ? : मुख्यमंत्री येणार म्हणून गुरुवारी शहरात प्रशासन कठोरपणे कामी लागले. रस्त्यांवर पांढरे पट्टे आखले गेले. अतिक्रमणात नसलेल्याही हातगाड्या उचलण्यात आल्यात. ही बाब स्वागतार्हच आहे; पण बुधवारच्या रात्रीपर्यंत अवघ्या शहरात या बाबींची कुणालाच फिकीर नव्हती. शुक्रवारपासूनही ती राहणार नाही. मुद्दा असा उपस्थित होतो की, मुख्यमंत्री जनतेचे असतील तर हे सर्व रोजच का घडत नाही ? राजांसाठी राबवावे तसे प्रशासन केवळ मुख्यमंत्र्यांसाठीच का राबविले जाते ? सामान्य जनतेसाठी का हे घडत नाही ?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}