शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांतील पाण्याची पातळी तपासा

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी.

पालकमंत्री : पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभाअमरावती : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी. पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित विभागाने सुनियोजित उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जि.प. सदस्य रवींद्र मुंदे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमुगराजन, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी के.टी. तुमाळकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. नांदगाव खंडेश्वर येथील पाळा व दाभा या गावांमध्ये होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी परीक्षण करावे, असे सांगितले. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो त्यावर त्वरित उपाय म्हणून जिल्हा नियोजन योजनेच्या प्रस्तावित निधीतून नवीन पाईप जोडणी करावी, असे त्यांनी सांगितले. वीज देयके वेळेत न भरल्यामुळे पंपाने पाणीपुरवठा करण्याबाबतच्या समस्येवर तसेच विहीर अधिग्रहणाबाबतच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी. नवीन विंधन विहिरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि अधिग्रहित विहिरींवर सौरपंप लावण्याबाबतचे नियोजन करावे, असेही निर्देश श्री पोटे यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले, नांदगाव खंडेश्वर येथे आवश्यक त्या ठिकाणी सिंचन विहिरींबाबत प्रस्ताव सादर करावा. चिखलदरा येथे १४ गावे पाणीटंचाईग्रस्त असून तेथे डिसेंबर, मार्च व जून अशा तीन टप्प्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खंडेमल गावाचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश होऊ शकतो, तर आवागड येथे पाणीपुरवठा योजना सुरू असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मोर्शी तालुक्यातील येरला गावातील पाण्याचा पाईप जोडणी करण्याबाबत, वरूड तालुक्यात विजदेयक न भरल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत, अचलपूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रामुख्याने समावेश करावा आणि सौरउजेर्चा कृषिपंप उपयोगात आणून पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश त्यांनी दिले. चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे पाण्याच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी पाच ठिकाणी सिंचन विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईवरदेखील चर्चा करण्यात आली. धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी या तालुक्यांचा आराखडा सादर करण्यात आला असून प्रथम टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)