शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

पान २ ची लिड असाईनमेंट अमरावती : दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत असून कोरोनाकाळात अनेकांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत. ...

पान २ ची लिड असाईनमेंट

अमरावती : दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत असून कोरोनाकाळात अनेकांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत. अशातच आता दादागिरीची क्रेझ असल्याने धारदार शस्त्र बाळगून वाहनाने फिरणाऱ्यांचे टोळकेही सक्रिय झाले आहे. दररोजचा खर्च भागविण्यासाठी लूटमारीसह चोरींचा पर्याय शोधून काढला आहे. अशातच काही रस्त्यांवर वाटसरूंना अडवून किंवा विनाकारण वाद निर्माण करून त्यांच्याकडून पैसे आणि महागड्या वस्तू हिसकावण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावर लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. रस्त्यावर वाहनाचा धक्का लागला, वाहनांची धडक झाली यावरून विनाकारण वाद निर्माण करून समोरच्या व्यक्तीला धाकदपट करून पैसे उकळल्या जात आहे. यासोबतच महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रकार पथ्रोटजवळ उघड झाला होता. शहरात राजापेठ हद्दीतील एका हॉटेलजवळ हॉटेलमालक समजून एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.

////////////////

अमरावती जिल्ह्यात घडले प्रकार

शहर तथा जिल्ह्यात विविध कारणांनी वाद निर्माण करून नंतर लुटल्याचे प्रकार घडले आहेत. चिखलदरा मार्गावर पर्यटकांना लुटण्यात आले होते. तर, कार अडवून एका डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शेतकऱ्यालाही मारहाणही झाली होती. यासंदर्भात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

——————

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते

१) अडवून ट्रकचालकाचा खून

सोयीबीनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा खून करून चोरट्यांनी २५० क्विंटल सोयाबीनने भरलेला ट्रक पळविल्याची घटना ८ जून २०२१ रोजी सकाळी अमरावती ते मोर्शी मार्गावरील निंभी ते आसोना गावादरम्यान उघड झाली होती. नागरिकांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

////////////

२) रात्री ११.४५ च्या सुमारास एका हाॅटेलच्या चौकीदाराला जुन्या बायपासवर आठ ते नऊ जणांनी अडविले. चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील रोकडसह मोबाईल व दुचाकी हिसकावून ते पळून गेले. १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. आरोपींनी आपल्याला एअरगन दाखविल्याचेही तक्रारीत नमूद होते.

////////////////

ही घ्या काळजी

रस्त्याने जात असताना अनोळखी व्यक्तीसोबत संवाद टाळावा, गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू संभाळून ठेवाव्या, बँकेचे व्यवहार करताना योग्य खबरदारी घ्यावी. चोरी, लूटमारीसह सायबर गुन्ह्याच्याही घटना वाढल्या आहेत. यासाठी योग्य खबरदारी घेऊन सावधान राहणे हिताचे ठरते. पोलीस असल्याची बतावणीदेखील केली जाते. त्यापासून सजग राहण्याचे आवाहन राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी केले आहे.