शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बंडोबांची मनधरणी, आता खेळ्या माघारीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक निकालाची रंगत आता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता माघारीसाठी खेळ्या खेळल्या जाणार ...

अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक निकालाची रंगत आता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता माघारीसाठी खेळ्या खेळल्या जाणार आहेत. निवडणूक बिनविराेध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत. तर काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यासाठी गळ घातली जाणार आहे. माघार घेण्यासाठी संबंधितांना गोड गोड बोलले जाईलही पण माघारीसाठी जो काही शब्द दिलेला आहे तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार? हा यक्ष प्रश्न संबंधितांना सतावत आहे. दरम्यान, ज्या गावात गेल्या काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून आली. जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. गावपातळीवर राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. यासाठी अनेक गावांतील चौकाचौकात, पारावर चहाच्या कँटिनवर, शेतात, धाब्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. गावाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भावी सरपंचांचा आखडा तापला असून कार्यकर्त्याची जुळवाजुळव सुरू आहे. उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले असून आता माघार कोण कोण घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यावर माघार घेण्यासाठी दबाबतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. काहीतरी आमिषे दाखवून निवडणूक लढविण्यापासून संबंधितांना माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माघारीची मुदत संपेपर्यत संबंधितांना गोड गोड बोलून वातावरण निमिर्ती केली जाणार आहे.

बॉक्स

सरपंच पदाची शाश्वती नाही...

पूर्वीचे चित्र उलटे होते. निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण काढायचे. हे पद आरक्षित झाल्यास सरपंचपदासाठी निवडणूक लढवणारे व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. आता आरक्षणच अंधारात आहे. भविष्यात सरपंचपद पदरात पडेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेक इच्छुक ऑक्सिजनवर आहेत.