शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:21 IST

शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

कांद्याची दामदुप्पट भावाने विक्री : ग्राहकांना धरले वेठीसअमरावती : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे. सामान्य ग्राहक मात्र चांगलाच वेठीस धरला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी एवढी दबंगगिरी वाढली की अनेक प्रकारच्या भाजीपालामध्ये दीडसे ते चारशे टक्के एवढा नफा कमावला जात आहे. त्यामुळे महागईच्या काळात भाजीपाल्यांचे भाव चांगलीेच वधरल्यामुळे व हे भाव मनमर्जीने वाढविल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. कांदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. गुरुवारी अमरावती बाजार समितीत फेरफटका मारला असता बुधवारी पांढऱ्या कांद्याची आवक, ३००किंटल एवढी झाली होती. या कांद्याला किंटलमागे कमीत कमी ४०० रुपये व जास्तीत जास्त ६००रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक १००किंटल झाली तर हा कांद्याला ठोक भावात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. परंतु हर्रास झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते संगनमताने भाववाढ करून ठोकमध्ये ४ रुपये, तर चिल्लर भाव १० ते १२ रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची ही शुध्द लूट असून यातून चिल्लर भाजीपाला दीडशे ते दोनशे पट एवढा नफा कमावला जात आहे. अमरावतीत ५०० च्या वर किरकोळ भाजीविक्रेते आहेत. ६०० ते ७०० फेरीवाले भाजीेपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यवसायातून रोज कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री होते. जर अशाप्रकारे भाजीपाला विक्रेत्यांकडून कृत्रिम लूट होत असेल तर यावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पडत आहे. मात्र जो शेतकरी काबाडकष्ट करून माल पिकवितो. त्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नाही. व्यापारी त्याचा भाव पाडतात. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल होत आहे व दुसरीकडे मोठे व्यापारी भाव पाडण्याचा घाट रचत आहेत. दुसरीकडे भाजीविक्रे ते प्रंचड भाववाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा गोरखधंदा करीत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे नागरिकांना दामदुप्पट भाव देऊन तो विकत घ्यावाच लागतो. त्यामुळे विक्रेते याचा गैरफायदा घेत आहेत.२ग्रामीण भागातील कांद्याला मागणी कांदेयाची आवक सध्या चांगली आहे. पूर्वी नाशिकचा कांदा यायचा. आता अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार, अचलपूर भागातील कांदा अमरावतीत दाखल होत आहे. पांढऱ्या कांद्याची ३०० किंटल तर लाल कांद्याची १०० क्विंटल रोज आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याची ओरड आहे.