शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

By admin | Updated: January 22, 2015 00:04 IST

ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत...

सुरेश सवळे  चांदूरबाजारज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम येथे धार्मिकस्थळी घाणीच्या साम्राज्यात आपल्या अस्तित्वावर अश्रू ढाळीत आहे. याच पुतळ्यासमोर ढाबा उभारण्यास परवानगी देण्यात असून तेथे रोज बकऱ्यांची कत्तल केली जाते. इतकेच नव्हे तर शेजारी असलेल्या ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीतील दूषित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र या गंभीर बाबींकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे. अख्या विदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील ऐन हिवाळ्याच्या मोसमात भरणारी बहिरम यात्रा हंडी, ब्रॅन्डी व तमाशासाठी ओळखली जात होती. येथे दररोज शेकडो बोकडांची कत्तल केली जाते. तमाशा या यात्रेचा केंद्रबिंदू होता. तमाशगीर महिलांव्दारे त्याकाळी २६ जानेवारीला होणारे झेंडावंदन वर्तमानपत्रावर पहिल्या पानावर झळाकायचे. गाडगेबाबांनी येथे समाजप्रबोधनाचे कीर्तन करुन येथील प्राण्यांच्या बळीला पायबंद घातला. त्यांचा आदर्श जागृत करण्यासाठी सन १९७१ मध्ये अमरावतीच्या तत्कालीन अनंत कॅम्पचे संचालक अजाबराव ठाकरे यांनी बहिरम यात्रेतील भगवान बाबा संस्थानच्या समोरील जागेत गाडगेबाबांचा पुतळा बसविला. याच परिसरातील १९७२ मध्ये पुंडलीकराव घोम यांनी दत्ताचे मंदिर बांधले. मूर्तीचे हात तुटल्यामुळे २००९ मध्ये परतवाड्याचे नगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी दत्ताची नवीन मूर्ती बसविली. शिरजगाव कसबा येथील रामचंद्र वांगे यांनी त्यावेळी स्वत:च्या मालकीचे पाच एकर शेत विकून आलेल्या पैशातून दत्त मंदिरासमोर भाविकांना बसण्याकरिता टिनशेड व सभागृह बांधले. आज त्या टिनशेडचा केवळ सापळा तेवढा शिल्लक आहे.एवढी वर्षे आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या धार्मिकस्थळी शाकाहारी व मांसाहारी ढाब्याची परवानगी देण्यात आली. या ढाब्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र देताना सदर जागा यात्रेकरू व बाजारासाठी राखीव असल्याने ढाब्यासाठी परवानगी देता येत नाही, असा शेरा तत्कालीन कारंजा (बहिरम) ग्रामपंचायतीच्या सचिवाने दिल्यानंतरही तत्कालीन सरपंचाने ढाबा उभारण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी परवानगी दिल्याची माहिती बहिरम संस्थानचे सुरेंद्र पाटील यांनी दिली. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ३० नोव्हेंबर २०११ रोजीपर्यंत होती. त्यामुळे मुदत संपल्याची नाटीस ग्रामपंचायतीव्दारे संबंधित मालकांना देण्यात आली. तरीसुध्दा ढाबा मालकाने ढाबा न हटविता पक्के बांधकाम केले. त्यामुळे ग्रामपंचाय व पंचायत समिती प्रशासनाने याविरुध्द न्यायालयात धाव घेतली. त्यावर ढाबा मालकाने स्थगनादेश मिळवून ढाबा अद्ययावत सुरू ठेवल्याची माहिती आहे. हा ढाबा अतिक्रमित जागेत उभारल्याची चर्चा आहे. ढाब्याच्या बाजूला केशवराव अढाऊ यांनी सन १९७१ मध्ये बांधलेल्या विहिरीत अंड्याची टरफल्ं टाकली जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.