शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाप्रमाणे संत्र्यालाही २५ हजार रुपये प्रतिटन हमीभाव द्या!

By admin | Updated: November 21, 2015 00:12 IST

अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते.

संत्रा उत्पादकांची मागणी : अन्यथा इच्छामरणाची परवानगी हवी वरुड : अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते. यामध्ये मृग आणि आंबिया असे दोन बहर घेतली जाते. परंतु प्रक्रिया होत नसल्याने आणि परप्रांतीय बाजारपेठेत मागणी नसल्याने संत्रा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ संत्रा उत्पादकावर आली आहे. त्या भावातही व्यापारी खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे सुलतानी संकट उभे ठाकले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाले. यामुळे ेकर्जाचा भार वाढत असल्याने शासनाने संत्र्याला ऊसाप्रमाणे २५ हजार रुपये प्रतिटन हमी भाव द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी देऊन ेशतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यातून केवळ विदर्र्भात संत्राचे उत्पादन घेतल्या जाते. वरुड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा पिकाखाली आहे. गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आंबिया बहराची संत्री आहेत. पण प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागली आहे. परप्रांतिय बाजारपेठेत भाव गडगडल्याने सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्र्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिहजार संत्र्याकरीता मोजावे लागत आहे. मध्य प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्चर् बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्याकडून कृषिमालमाध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केली जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करून वायनरी, रस प्रक्रिया केंद्र तसेच आदी उत्पादनामध्ये ेवापर केल्यास बहुगुणी संत्राला चांगले दिवस येतील, अशी संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे. देशातील विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीसुध्दा हमीभावाने संत्रा खरेदी केल्यास संत्र्यापासून तयार होणारी विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास याचा लाभ शेतकरी तसेच व्यावसायिकांना होऊ शकते. थेट विक्रीला महत्त्व प्राप्त झाल्यास अधिक भाव मिळण्यास सुरुवात होईल. याकडे शासनाने कधीही लक्ष केंद्रित केले नसल्याने संत्रा उत्पादक उपेक्षित रािहला. देशात दारू, बियर, औषधी, आयुर्वेदिक औषधी तसेच भांडी, कपडे धुण्याची डिटर्जेंट पावडर, शितपेये आदींमध्ये संत्र्याचा वापर वाढल्यास पुन्हा संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील.