शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 6:48 PM

यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकरअमरावती : यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस थांबल्यानंतरही परतीच्या दमदार पावसामुळे काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्यास मदत झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८५.१० टक्के पाणीसाठा आहे. एकूण २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ९२.७७ टक्के पाणीसाठा आहे. ४७६ लघु प्रकल्पांत ७२.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२२०.१५ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा २६४४.४८ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ८२.१२ टक्के एवढी होते. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ७२.७३ टक्के, अरुणावती १५.९७ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा ६९.०६ टक्के, वान १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पांत ८२.११ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९७.८३ टक्के पाणीसाठा आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांची गेट अद्यापही उघडेच आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती ?अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पांत ९९.७४ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा १०० टक्के, पूर्णा ९९.२१ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पांत १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.९१ टक्के, वाघाडी ९४.६३ टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगांव ९९.१२ टक्के, निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ८१.०९ टक्के, उमा ६६.८७ टक्के, घुंगशी बॅरेज ८६.५७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९०.३३ टक्के, सोनल १०० टक्के, एकबुर्जी ८४.६३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी ५६.४८ टक्के, मन १०० टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चार प्रकल्पांची सहा गेट तर बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकल्पांचे गेट उघडेच आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भWaterपाणी