शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राज्यात ४३,३६४ गावे अजूनही टंचाईग्रस्त, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा गैरव्यवहार विधिमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 5:39 PM

राज्यात १३ योजनांमधून ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविली जात असताना अजूनही ४३,३६४ गावे टंचाईमुक्त झाली नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने याकडे दुर्लक्ष चालविल्याचा आक्षेप नोंदवित धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी...

अमरावती - राज्यात १३ योजनांमधून ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविली जात असताना अजूनही ४३,३६४ गावे टंचाईमुक्त झाली नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने याकडे दुर्लक्ष चालविल्याचा आक्षेप नोंदवित धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न दाखल केला आहे.गत ४० ते ४५ वर्षांपासून विविध १३ योजनांमधून ग्रामीण पाणीपुरवठ्याची कामे केली जातात. तरीही ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. बुलडाणा, वाशिम जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा योजनेत सुमारे २ हजार कोटींचा अपहार झाल्याचे उदाहरण देत आ. जगताप यांनी यंत्रणावर बोट ठेवले आहे. तारांकित प्रश्न क्रमांक १०६२४ अन्वये आ. जगताप यांनी ग्रामीण पाणीपुरठा योजनेतील गैरव्यवहाराबाबत शासनाला जाब विचाराला आहे. शासनाने सन २०१० पासून राष्ट्रीय पेयजल योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपविली. समितीचे पदाधिकारी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याने पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण राहत असून, शासन निधीची लूट होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लेखापरीक्षणासाठी राज्य शासनाने लोकल आॅडिट फंड नावाने स्वतंत्र कार्यालये राज्यभर स्थापन केले. मात्र, हा निधी स्वतंत्र बँकेत ठेवण्यात येत असल्याने लोकल आॅडिट फंडने राष्ट्रीय पेयजल योजनेवर झालेल्या खर्चाचे निधीचे आॅडिट केले नाही अथवा त्यावर लेखाआक्षेप नोंदविले नाही. या योजनेत निरंतरपणे गैरव्यवहाराचा प्रवास सुरू असताना सन २०१२-२०१३ मध्ये अमरावती जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागाचे लेखापरीक्षण सहायक लेखाधिकारी सदानंद वाानखडे यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रीय पेयजल योजनेत विविध मार्गाने होणारे अपहाराविषयी ५१ मुद्यांचा अहवाल वानखडे यांनी पंचायत राज समितीकडे पाठविला होता. ही योजना ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत राबवू नये, असे लेखाआक्षेप सदानंद वानखडे यांनी शासनाकडे पाठविला होता. अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आ. जगताप यांनी वर्षानुवर्षे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत अपहार होत असताना ते रोखण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्यात? दोषींवर कारवाई का झाली नाही? ५१ मुद्द्यांच्या लेखाआक्षेपाकडे दुर्लक्ष करण्याची कारणे काय? असे प्रश्न उपस्थित केले आहे. आ. जगताप यांचे तारांकित मान्य झाल्यामुळे शासनाने स्थानिक निधी लेखा संचालकांना ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराबाबतची माहिती, लेखापरीक्षणात नोंदविलेले आक्षेप मागविले आहेत.

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतील ७२ योजना अपूर्ण आहेत. सहा वर्षांपासून त्या पूर्ण झाल्या नसताना पाणीटंचाई उपाययोजनेत त्यास प्राधान्य न देता नव्या योजना सुरू केल्या जातात. त्यामुळे अपूर्ण योजना कोण पूर्ण करणार, असा सवाल यानिमित्ताने शासनाकडे केला.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वे

टॅग्स :WaterपाणीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र