शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात ४० टक्के रासायनिक प्रदूषण

By admin | Updated: December 30, 2014 23:25 IST

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड,

वैभव बाबरेकर - अमरावती
जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड, क्लोराईड, हार्डनेस, अल्कलिनिटी व टरबिरीटीसुद्धा असल्याने जिल्ह्यावासीयांच्या आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.
पाणी हे जीवनाचे अमूल्य घटक असून पाणी अशुध्दतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात हजारो पाणी स्त्रोतातून सुमारे ३० लाख नागरिक पाणीपुरवठा होतो. मात्र, हे पाणी शुध्द असेल याची हमी देता येणार नाही. पाणी शुद्धतेसाठी केंद्र व राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यासाठी शासनाकडून पाणी तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरु करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी निसर्गात होणाऱ्या बदलात पाणी स्त्रोतांची काय स्थिती आहे त्याकरिता शासनाकडून जिल्ह्यातील पाच ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरु आहेत.
ग्रामीण भागात नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, मोर्शी, धारणी व अचलपूर येथे उपविभागीय प्रयोगशाळेत अनुजीव व रासायन तपासणी करण्यात येते. अमरावती शहरातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जून २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत ५ हजार ४६ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ३ हजार ७७३ नमुने दूषित आढळून आले आहे. हे प्रमाण ७४ टक्के आहे. या वर्षात २२०० पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्टे प्रयोगशाळेला आहे.