शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापासून १३० आत्महत्या, शासनाच्या लेखी तरीही आलबेल !

By admin | Updated: October 17, 2015 00:17 IST

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला.

अमरावती : यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीनमध्ये रोटाव्हेटर फिरविण्याचे सत्र जिल्हाभरात सुरू आहे. शुक्रवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत जिल्ह्यातील १,९८१ गावांपैकी एकाही गावाचा समावेश नाही. जिल्ह्यात आलबेल स्थिती दर्शविली हे धक्कादायक आहे.यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणी पश्चात पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी मारली. सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने शेंगा पोचट राहिल्या. त्यातच पिवळ्या मोझॅकच्या अटॅकमुळे दाणा भरलाच नाही, एकरी पोतभर झडती येण्याची आशा नाही, उत्पादन खर्च दूर, मळणीचा खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.परतीचा पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे जमिनीत आर्द्रता नाही. यामुळे कापूस, तुरीची वाढ खोळंबली आहे. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीवर किडी व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही या घोर चिंतेत शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत असताना त्याच्या पदरी निराशा आली आहे. जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र असणाऱ्या जिरायती क्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बागायती क्षेत्रातील अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा आहे. आंबिया बहाराची फळगळ होत आहे. संत्र्याचे मार्केट पुरते कोलमडले आहे. भाव कमी असल्याने व्यापारी फिरकेनाशे झाले आहेत. पुढचा बहर घेण्यासाठी संत्रा तोड एव्हाना व्हायला हवी होती. मात्र, खरेदीदारांअभावी संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. खरीपही गेला, रबीची तीच अवस्था, अन् शासन म्हणते जिल्हा आलबेल ही शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)