शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

१०५ सुवर्ण, २२ रौप्य; पीएचडीने ४३९ जणांना गौरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:26 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला.

ठळक मुद्देविद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ : ३६,७२२ पदवी, ४८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला. यावेळी ४३९ संशोधकांना आचार्य (पीएचडी), एका संशोधकास मानवविज्ञान पंडित, गुणवंतांना १०५ सुवर्ण, २२ रौप्य पदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३६ हजार ७२२ विद्यार्थ्यांना पदवी आणि ४८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. संतोष ऊर्फ भुजंगराव ठाकरे यांना कुलगुरूंच्या हस्ते डी.लिट. प्रदान करण्यात आली. यावेळी सर्वाधिक पदके प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये सचिन जोशी, मदीहा महरोश मो. साकिब, प्रियल काजळकर यांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांना पदके, पुरस्काराने गौरविलेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदके, पारितोषिके देऊन शुक्रवारी गौरविण्यात आले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पदके देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.विविध विद्याशाखेचे पदक पुरस्कार्थीदिव्या संतानी (रसायनशास्त्र, दोन सुवर्ण, रौप्य), सबा नाज अब्दुल खालीद सादागर (प्राणिशास्त्र, सुवर्ण), गोकुल बजाज (वनस्पतिशास्त्र, दोन सुवर्ण, रौप्य), विशाखा आसटकर (गणित, सुवर्ण, रौप्य), पायल वसुले (गणित, सुवर्ण), आकाश धर्मिक (जीवतंत्रशास्त्र, रौप्य), धनश्री कोठेकर (पदार्थविज्ञान, सुवर्ण), सारिका सुरवाडे (सूक्ष्मजीवशास्त्र, सुवर्ण), राणी कोल्हे (वनस्पतिशास्त्र, सुवर्ण), पायल झुंदानी (गणित, रौप्य), मदीहा महरोश मो. साकीब (विज्ञान, पाच सुवर्ण, तीन रौप्य), सीमा पुरबूज (विज्ञान, रौप्य), नम्रता रायबोले (रसायनशास्त्र, सुवर्ण)अभियांत्रिकी तांत्रिकी पदक, पुरस्काराचे मानकरीप्रियल काजळकर (स्थापत्य, पाच सुवर्ण), तुबा शबनम मो. मुकर्रम (ईटीसी, दोन सुवर्ण), प्रशांत जामोदकर (इलेक्ट्रॉनिक्स पॉवर, सुवर्ण), वर्षा वर्मा (वास्तुविज्ञान, सुवर्ण), अदिती झुनझुनवाला (आयटी, सुवर्ण), प्रवीण पाटील (टेक्सटाइल इंजिनीअरिंग, सुवर्ण), साजिद शेख हुसेन (केमिकल इंजिनीअरिंग, सुवर्ण), गार्गी मोहरील (यांत्रिकी, तीन सुवर्ण), अपेक्षा उमाटे (संगणकशास्त्र, तीन सुवर्ण), भावेश क्षीरसागर (भेष्यज विज्ञान, दोन सुवर्ण), ईश्वरी सावजी (कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, सुवर्ण).वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखापूजा लालवानी (व्यवसाय प्रशासन, तीन सुवर्ण), सपना पिंजानी ( वाणिज्य पारंगत, सुवर्ण), तेजल पुनसे (वाणिज्य स्नातक, चार सुवर्ण), रूचिता जोशी (वाणिज्य स्नातक, रौप्य), नेहा बुटोलिया (व्यवसाय प्रशासन, सुवर्ण).मानवविज्ञान विद्याशाखा पदक पुरस्कार्थीओमेश्वरी बंड (इंग्रजी, दोन सुवर्ण), स्नेहा ढोले (इंग्रजी, रौप्य), सचिन जोशी (मराठी, सहा सुवर्ण), पूजा गायकवाड (भारतीय संगीत, सुवर्ण), निहारिका घोडेराव (संस्कृत, सुवर्ण), अरशी परवेज दोकडिया (इंग्रजी वाङ्मय, सुवर्ण), पूजा महेशकर (संस्कृत वाङ्मय, दोन सुवर्ण), प्राजक्ता काळबांडे (संगीत, रौप्य), करुणा शिरसाट (वाङ्मय स्नातक, सुवर्ण), नाजीया परवीन नसीबखां (वाङ्मय उर्दू, सुवर्ण), प्रीती सहारे (संस्कृत, सुवर्ण), पूजा डाहाके (मराठी वाङ्मय, सुवर्ण, रौप्य), तेजश्री निचडे (पाली, सुवर्ण).समाजविज्ञान विद्याशाखेतील पदक, पुरस्कार्थीमनीषा कडू (अर्थशास्त्र, दोन सुवर्ण), विशाल वानखडे (राज्यशास्त्र, सुवर्ण), सारिका वनवे (समाजशास्त्र, सुवर्ण), पूजा गुल्हाने (अर्थशास्त्र, रौप्य), मेघा बावने (गृहअर्थशास्त्र, सुवर्ण), शीतल वरठी (भूगोल, सुवर्ण), वैशाली कोरडे (इतिहास, सुवर्ण), भावना शिरसाट (राज्यशास्त्र, सुवर्ण), करुणा शिरसाट (अर्थशास्त्र, सुवर्ण, रौप्य), अमीर इस्त्राईल शेख (विधी पारंगत, दोन सुवर्ण), प्रशिक गवई (विधी, सुवर्ण), नितीश शर्मा (विधी, तीन सुवर्ण, एक रौप्य), निकिता शर्मा (अभ्यास विद्याशाखा, सुवर्ण), नाझिया नझीस मो. सलिम (शिक्षण स्नातक, दोन सुवर्ण), पूजा दायमा (गृहविज्ञान, सुवर्ण), कावेरी येवले (गृहविज्ञान, रौप्य), प्रणिता राठोड (गृहविज्ञान, रौप्य), मुनाझा सिद्दीक मिर्झा (गृहविज्ञान, सुवर्ण), तृप्ती घाटोळ (एमएमसी, दोन सुवर्ण), शबनम कासीम सय्यद (एमएमसी, सुवर्ण), प्रतीक पाटमासे (एमएमसी, रौप्य), शुभम पोलाडे (ग्रंथालय, माहिती, सुवर्ण), आरती सावळे (ग्रंथालय, माहिती, सुवर्ण), ऋतुजा माई (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण, रौप्य), पलक चिराणिया (आयु:शल्य विज्ञान, तीन सुवर्ण), खोजा आर्फिन अफताब अली (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण), कस्तुरी भिसे (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण), भक्ती मेहता (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण, रौप्य), सय्यद इमरान अली (आयुर्वेदाचार्य, दोन सुवर्ण).

आचार्य पदवीप्राप्त नवसंशोधकांमध्ये नाराजीमहत्प्रयासाने आचार्य पदवी (पीएच.डी.) प्राप्त करणाºया नवसंशोधकांना कुलगुरू अथवा पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान न करता, ती संबंधित विभागातून दिली जाईल, असा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार दीक्षांत समारंभात आचार्य पदवी मिळविलेल्या नवसंशोधकांना जागेवर उभे करून त्यांना पदवी बहाल केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, मंचावर बोलावून सन्मानाने आचार्य पदवी बहाल न केल्याबद्दल नवसंशोधकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.