शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंधळ’ संपण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: October 14, 2014 01:26 IST

पुरातन कला जपण्यासाठी नवी पिढी अनुत्सुक; गोंधळी समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज.

राम देशपांडे /अकोला

        मंगल कार्याप्रसंगी विविध देवी-देवतांचा गोंधळ घालण्याची परंपरा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या गोंधळी समाजाने जपली आहे. काळाच्या ओघात ही प्रथा सुरू ठेवण्याविषयी नवीन पिढी फारशी उत्सुक नाही. परिणामी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात ही कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. शूभकार्याप्रसंगी देवीची स्तुती व पूजा करून गोंधळ घालण्याची प्रथा जुन्या काळी उदयास आली. पुराणादी लेखांमध्येही या कलेचा उल्लेख आढळतो. गनिमी काव्याचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गोंधळी समाजाने विकसित केलेल्या ह्यकरपल्लवीह्ण या सांकेतिक भाषेचा वापर केला होता. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी गोंधळ घालून दैवी शक्तीला जागृत करणारे गोंधळीबुवा सर्वज्ञात आहेत. संबळ, तुणतुणं, टाळ, डफ अशी सर्व वाद्ये घेऊन तीन-चार गोंधळींचा समूह गोंधळ घालण्यासाठी घरोघरी जातात. खंडोबा, जोतिबा, काळू आई, रेणुका अशा विविध देवी-देवतांचा जागर गोंधळींद्वारे घातला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गोंधळी समाजाने जपली असली तरी, सध्याच्या घडीला गोंधळी समाज अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. गोंधळाच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना सद्यस्थितीत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून, नाइलाजाने इतर लहान- मोठय़ा व्यवसायांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने गोंधळी समाजाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट केले असले तरी, शासनाच्या कित्येक योजना या समाजापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. तद्वतच, या कलेतून फारसे उत्पन्नही मिळत नसल्याने, या समाजाची नवीन पिढी वडिलोपार्जित परंपरा पुढे चालवावयास तयार नाहीत. शासनाने ज्येष्ठ कलाकारांसाठी सुरू केलेल्या अनुदान योजनेपासून या समाजातील हजारो ज्येष्ठ नागरिक अद्याप वंचित आहेत. केवळ आश्‍वासनांचे तुणतुणे वाजविणार्‍या अधिकार्‍यांना वारंवार अर्ज, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. या समाजाला मदतीच्या हाताची गरज आहे. केवळ नोकरी आणि व्यवसायामागे धावणार्‍या नवीन पिढीमुळे भविष्यात ह्यगोंधळह्ण कला लोप पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजू पेंढारी यांनी व्यक्त केले.