शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
4
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
5
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
6
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
7
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
8
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
9
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
10
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
11
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
12
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
13
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
14
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
17
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
18
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
19
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
20
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र आराखड्यात प्रस्तावित ...

संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र आराखड्यात प्रस्तावित ७१२ उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाइ निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते जूनअखेरपर्यंतच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गत ८ मार्च रोजी मंजुरी दिली. मंजूर कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९७ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता विविध ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६८९ उपाययोजनांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा कागदावरच असून, पाणीटंचाई निवारणासाठी प्रस्तावित उपाययोजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केव्हा सुरू करण्यात येणार आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या केव्हा संपणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कृती आराखड्यात प्रस्तावित अशा आहेत उपाययोजना!

तालुका गावे उपाययोजना

अकोला ८० ९५

बार्शीटाकळी १५ ३०

बाळापूर २२ ५१

पातूर ४७ ५९

मूर्तिजापूर ६२ ७३

अकोट ७५ ६७

तेल्हारा ३८ ७२

पूर्ण केलेल्या उपाययोजनांची

अशी आहेत कामे!

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ७१२ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये विहिरी खोल करणे व गाळ काढणे ३६, विहिरींचे अधिग्रहण करणे २००, टँकरद्वारे पाणीपुरवठा १०, नळ योजनांची विशेष दुरुस्ती ७०, तात्पुरत्या पूरक नळ योजना ११, नवीन विंधन विहीर १८७ व नवीन कूपनलिका १४९ इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ २३ उपाययोजनांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये १४ विहिरींचे अधिग्रहण व ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

७७ उपाययोजनांच्या कामांना मान्यता!

पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १४ विहिरींचे अधिग्रहण आणि ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित कामे अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.