शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 10:53 AM

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नया अंदुरा : नया अंदुरा परिसरात २ जानेवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. हरभरा, गहू, कपाशी व तूर या पिकांच्या पानांची चाळणी झाली. त्यामुळे पिकांना लावलेला खर्चही निघत असल्याची शक्यता वाढल्याने नया अंदुरा, कारंजा, रमजानपूर, निंबा फाटा शेतशिवारातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील परतीच्या पावसाने आधीच सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तूर, कपाशी व रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांकडून मोठी आस होती; परंतु अचानक २ जानेवारी रोजी पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह वादळवाºयासह गारपीट झाली. त्यामुळे हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. सतत शेतकºयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.गत आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर धुके आणि आता पाऊसही पडला आहे. काही पिकांना पाऊस, थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुक्यामुळे पिकावरील पात्यांवर मोठ्या प्रमाणात दव जमा होत आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

पहाटे गारपीट बोरगाव वैराळे, अंदुरा शेतशिवारात गुरुवारी पहाटे गारपीट झाली. अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळवारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला आहे. यावर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाकडून मोठी आशा असताना रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.४बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांना सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून, पिकांचे मातेरे झाल्याने लावलेला खर्चही वसूल झाला नाही.४कपाशीवर बोंडअळीची सुरुवात झाल्याने परिसरातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असताना अळीने आक्रमण केले आहे. नव्याने तयार होत असलेली कपाशीची बोंडे किडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हताश होऊन शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडून उलंगवाडी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हातरूण

बोरगाव वैराळे, अंदुरा परिसरात गुरुवारी पहाटे वादळवारा व पावसाने हजेरी लावली. बोरगाव वैराळे परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभरात पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. ग्रामीण भागात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवारा आणि अवकाळी पाऊस यामुळे तूर, हरभरा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. बाळापूर

तालुक्यातील हातरूण, बोरगाव वैराळे, दुधाळा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, निमकर्दा, मांजरी, अंदुरा, शिंगोली, मालवाडा भागात अवकाळी पाऊस झाला. तूर, हरभरा, गहू, ओवा व कपाशी या पिकांना वादळवारा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीHailstormगारपीट