शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिका-यांना आता १२७५ रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: November 24, 2014 00:09 IST

महसुल विभागातील संवर्गामध्ये समाधान

संतोष मुंढे/वाशिम

         राज्यभरातील साझे व महसुल मंडळात कार्यरत तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना दरमहा १२७५ रुपये प्रवासभत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बर्‍याच वर्षापासून या दोन्ही संवर्गाच्या मागणीबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने या दोन्ही महसुल विभागातील संवर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. एक, दोन किंवा अपवादात्मक स्थितीत तीन पेक्षा जास्त गावांचा समावेश असलेल्या साझाची जबाबदारी सांभाळणारा तलाठी. तर किमान सहा साझांचे मिळून बनलेल्या एका महसुली मंडळाचा प्रमुख म्हणजे मंडळ अधिकारी. महसुली विभागाच्या क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या अधिकारी कर्मचार्‍यावर आपल्या विभागासह इतरही विभागाशी संबधीत योजनांची अंमलबाजावणी करण्याची जबाबदारी ठरलेली. या जबाबदारीच्या अनुषंगाने संबंधीत अधिकारी कर्मचार्‍यांना आपल्या अख्त्यारितील गावांमध्ये फिरावे लागते. अनेकदा कामानिमीत्ताने तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्यांना क्रमप्राप्त असते. होणार्‍या प्रवास खर्चाची देयके सादर करताना संबधीत अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच दमछाक होत होती. अनेकदा त्यांना प्रवास भत्ता देयके सादर करणेही शक्य होत नाही. सोबतच प्रवासावर खर्च होणार्‍या रक्कमची प्रतिपूर्ती मिळण्यास बराच कालावधी लागत होता. त्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना असणार्‍या प्रवासभत्ता देय असणार्‍या सोयीप्रमाणे दरमहा वेतनात दैनिक भत्त्यासह कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघटनेच्यावतीने शासनाकडे बर्‍याच वर्षापासून लावून धरण्यात आली होती. यामध्ये तलाठी संवर्गाला दरमहा २ हजार रुपये तर मंडळ अधिकार्‍याला किमान ३ हजार रुपये दरमहा प्रवासभता देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर निर्णय घेत राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २0१४ रोजी राज्यभरातील तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना दरमहा १२७५ रुपये प्रवास भत्ता दैनिक भत्त्यासह मंजूर केला आहे. हा भत्ता तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना १ सप्टेबर २0१४ पासून अनुट्ठोय राहणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी येणार्‍या अतिरिक्त खर्चास प्रत्यक्ष विधी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर व त्यासंबंधीची तरतूद झाल्यानंतरच निधी वितरीत करण्यात येणार असल्याचे शासनाच्यावतीने उपसचीव डॉ. माधव वीर यांच्या स्वाक्षरीनिशी काढलेल्या अध्यादेशातून स्पष्ट केले.