शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत केवळ १६ टक्केच रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:22 IST

ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

- राजरत्न सिरसाट
अकोला: मान्सून उशिरा पोहोचल्याने यावर्षी खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पेरणीसाठीच्या मशागतीची कामे आता सुरू झाली असून, आजमितीस राज्यात ९ लाख हेक्टर, १६ टक्केच पेरणी झाली. ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यात रब्बीची पेरणी घटली होती. यावर्षी पूरक पाऊस पडला; परंतु हा पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना वेळ लागत आहे. राज्यासह विदर्भातील परिस्थिती रब्बी पेरणीसाठी अद्याप पूरक नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान,पीक काढल्यानंतर लगेच काढता येत नाही त्याला दोन एक दिवस शेतात ठेवावे लागते,शिवाय काढणीसाठी लागणारे मळणी यंत्रही वेळेवर मिळत नाही.अशातच ओडिशा राज्यात आलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे विदर्भातही पाऊस येतोय का, या भीतीने शेतकऱ्यांनी पीक कापणी थांबविली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी आता सोयाबीन व ज्वारी काढणी सुरू केली आहे.
विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी सहा लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख ६० हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकºयांनी भर दिला आहे. यावर्षी धरणांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. नागपूर विभागात गतवर्षी ४ लाख ११ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. पेरणी ३ लाख ५५ हेक्टरवर झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यानुषंगाने कृषी विभागाने ४,११८.०९ हेक्टरचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २९ हजार ७३ हेक्टर म्हणजेच ७.२३ टक्केच पेरणी झाली आहे.


अवेळी व परतीचा पाऊस लांबल्याने शेतकºयांना पीक काढणी करता आली नाही. पावसाने उसंत दिल्यानंतर ही कामे सुरू झाली आहेत. आता मशागतीच्या कामांना वेळ लागणार असल्याने यावर्षी दोन ते तीन आठवडे रब्बी हंगाम पुढे जाणार आहे.
- सुभाष नागरे,
विभागीय कृषी सहसंचालक,
अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती