शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 4:09 PM

घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे.

अकोला: जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. अशा घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी राऊतवाडीतील चिमुकल्या मुलांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून कागदी पिशव्या व पाकिटे बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठीच नाही तर मनुष्य, प्राण्यांसाठीसुद्धा घातक आहेत. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे; परंतु बंदीचा कुणावरच परिणाम होत नाही. भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. अशा घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी चिमुकले मंडळी पुढे सरसावली आहेत. राऊतवाडीतील श्यामली वानखेडे, ओजस राऊत, पार्थ वानखडे, आर्या वानखेडे, अनू राऊत, रेणुका राऊत, वीर वानखडे या चिमुकल्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर, त्यांच्या शाळेला सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि समाजात जनजागृतीसुद्धा व्हावी, यासाठी या चिमुकल्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्लास्टिक पर्यावरण आणि मनुष्यासाठी घातक असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेशच या चिमुकल्यांनी दिला आहे. दररोज ४0 ते ५0 कागदी पिशव्या तयार करून ही चिमुकली मंडळी परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. या चिमुकल्यांनी सुरू केलेला कागदी पिशव्या निर्मितीचा उद्योग परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. कोवळ्या मनाच्या मुलांना जे कळतं ते आम्हा मोठ्यांना का कळत नाही? 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीenvironmentवातावरण