शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विलीनीकरणाच्या नावाखाली मूर्तिजापूर आगारावर संक्रांत!

By admin | Updated: June 13, 2017 00:31 IST

तेल्हारा आगार अकोटात विलीन करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील दोन आगारांसह राज्यातील पाच आगारांचे विलीनीकरण करण्याचे प्रस्तावित असून, या आगारांच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. मूर्तिजापूर आगार बंद करून ते कारंजा आगारात, तर तेल्हारा आगार अकोटमध्ये विलीन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील दोन आगाराव्यतिरिक्त राज्यातील आणखी तीन आगारांचे विलीनीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. मूर्तिजापूर आगाराचे भूमिपूजन ३० नोव्हेंबर १९९७ रोजी तत्कालीन परिवहन मंत्री चंद्रकांत खैरे व एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजीराव गोताड यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर मूर्तिजापूर येथे ९ मे २००३ रोजी मूर्तिजापूर आगार सुरू झाले. स्थापनेच्या १४ वर्षांनंतरही आगारात सुविधांची वानवा आहे. एवढेच नव्हे तर आगाराला मान्यतेपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. आगाराच्या सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या नावाखाली मूर्तिजापूर आगार बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. याविषयी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या समितीची बैठक २ जून रोजी झाली. या बैठकीत मूर्तिजापूर आणि तेल्हारा आगाराची माहिती संबंधिताना देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर या समितीची पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाने आगाराची संख्या वाढवणे अपेक्षित असताना महामंडळाने मात्र आहे त्या आगारांना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. मूर्तिजापुरात आगाराची गरज मूर्तिजापूर शहरातून यवतमाळ-परतवाडा या मार्गावर शकुंतला नॅरोगेज रेल्वे धावते. याशिवाय मूर्तिजापूर हे मध्य रेल्वेचे मोठे रेल्वे स्टेशन आहे. महामार्गावर असल्याने येथून अनेक बस मोठ्या शहरामध्ये जातात. असे असताना मूर्तिजापूर आगार शहरातच ठेवण्याची गरज आहे. मात्र, ते विलीन करण्याचा घाट घातल्या जात आहे. त्याला लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनी विरोध करण्याची गरज आहे. मूर्तिजापूर आणि तेल्हारा आगारांमध्ये असलेली कर्मचारी संख्या व इतर माहिती वरिष्ठांनी मागितली होती. या आगारांच्या विलीनीकरणाचा निर्णय अजून झालेला नाही. दोन्ही आगारांची माहिती वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे. - सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला