शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत मतदारांच्या मस्तकी मारला ‘डिलिट’चा शिक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:28 IST

भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.

अकोला: मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, जिवंत मतदारांना चक्क मयत दाखविणे, मयत उमेदवाराचे नाव बाद न करता त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांचे नाव बाद करणे, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा दुरुस्तीसाठी सादर केलेल्या अर्जाशिवाय असंख्य मतदारांवर ‘डिलिट’चा शिक्का मारून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इमानेइतबारे पार पाडले होते. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा घोळ टाळण्यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील व भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या व कामकाजात दुरुस्ती करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडेल, असा आशावाद जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला होता. ऐन मतदानाच्या दिवशी शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य मतदारांना निवडणूक विभागाच्या हलगर्जीपणामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे चित्र समोर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत असाच घोळ पुन्हा झाल्यास मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी निवडणूक विभागाकडे धाव घेतली. तसेच नागरिकांना त्या-त्या भागातील मतदान केंद्र उपलब्ध न करून दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा दावाही भाजपकडून क रण्यात आला. अशा मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी भाजपच्यावतीने भानुदास एन्नावार, नगरसेवक विजय इंगळे अजय शर्मा, अमोल गोगे, बबलू पळसपगार, रणजित खेडकर, राजेश चौधरी, योगेश नागपुरे, हेमंत शर्मा व रमेश करिहार यांनी केली आहे.जिवंत मतदार केले ‘डिलिट’!लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्र गाठल्यावर मतदार यादीमध्ये त्यांच्या छायाचित्रावर ‘डिलिट’चा शिक्का मारला असल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. मतदार जनजागृती मोहिमेत नवीन मतदारांचा समावेश करणे, मयत मतदारांची नावे बाद करणे तसेच पत्ता बदलण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केल्यावरच ‘बीएलओं’नी दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त होते. या ठिकाणी मतदारांनी कोणत्याही दुरुस्त्यांचे अर्ज सादर न करताही निवडणूक विभागाने परस्पर घोळ घातला होता. यामुळे निवडणूक विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा