शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

अकोल्यातील पहिल्या महिला आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:17 PM

अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देमुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.

अकोला : अकोला जिल्ह्यातील  पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.  गत काही दिवसांपासून आजारी असलेल्या कुसुमताई यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कुसुमताई कोरपे या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णसाहेब कोरपे यांच्या धर्मपत्नी होत.डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म १९ आॅगस्ट १९२८ रोजी सपकाळ कुटुंबात झाला. त्याकाळातील अकोल्यातील नामवंत कायदेपंडीत व राजकीय पुढारी अ‍ॅड. श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांचे वडील होत. त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री स्व. निळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ हे सुप्रसिद्ध वकील आणि सहकार नेते होते.  कुसुमताई यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवेचे व्रतस्थ असल्यामुळे त्यांचाही पींड समाजसेवेचा बनला. सुरवातीपासूनच त्यांचा ओढा विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी विद्यार्जन ठेऊन एम. ए. ची पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठाने विदर्भातील २० व्या शतकातल ग्रामीण नेतृत्वाचा विकास हा त्यांचा शोध प्रबंध स्वीकारून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातीील समाजकार्य प्रभावी राहिले. १९५७ ते १९६७ या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजोपयागी कार्ये केली. मुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत. जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. विधानसभेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. सिलिंग व कुळकायदा या बाबतचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनिय राहिले आहे.  महाराष्ट्र को. आॅप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि. मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका म्हणून राहिल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्या होत्या.  राजकीय व सामाजीक क्षेत्रात वावरतानाच आदर्श गृहिनी,आदर्श पत्नी व  आदर्श माता या भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांची दोन मुले व तीन मुली वैद्यक शास्त्रात उच्च विद्याविभूषित होऊन मानवी सुश्रृषेच्या पवित्र कार्यात व्रतस्थ आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूsocial workerसमाजसेवक