शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

ग्रामसेवक युनियनचा ‘सीईओ हटाओ’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:37 PM

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कामकाजामध्ये कोणतेही सहकार्य केले जाणार नाही.

अकोला: जिल्ह्यातील ३२२ ग्रामसेवकांना कार्यमुक्त करून त्यांचे मुख्यालय पंचायत समिती स्तरावर केल्याने या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने निषेध नोंदवला. सोबतच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कामकाजामध्ये कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा निर्णय युनियनच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत घेतल्याचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या दोन दिवसात आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील जनसामान्यांची कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन सुविधा तसेच योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्या सोडविण्यासाठी तसेच विकास कामे, नागरी सुविधा, प्रचलित अनुदान योजना राबविण्यासाठी सीमित कालावधी आहे. त्यामुळे अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे ही कामे प्रभावित होऊ नयेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यंत्रणा बदल करावी, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर ग्रामस्थांची कामे होण्यासाठी बदल करावे, असे निर्देश ग्रामविकास विभागाने ३१ आॅगस्ट रोजी दिले. त्यानुसार शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील ३२२ ग्रामसेवकांना कार्यमुक्त केले. त्यांचा प्रभार नव्यानेच नियुक्ती दिलेले ५० कंत्राटी ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावर असलेले ५६ विस्तार अधिकारी, तर उर्वरित २१६ पदांचा प्रभार संबंधित गावांतील शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्याचा आदेश दिला. या काळात ग्रामसेवकांचे मुख्यालय पंचायत समिती कार्यालय करण्यात आले आहे. त्यांना तेथे हजेरी नोंदवण्याचे बजावले. या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकांची बैठक रविवारी तातडीने बोलावण्यात आली. त्या बैठकीत सर्व ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाचा निषेध केला. तसेच राज्य पदाधिकाºयांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरवली. त्यामध्ये येत्या दोन दिवसात आंदोलन केले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कोणत्याही कामात सहकार्य केले जाणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. राज्य आणि जिल्हा शाखा पदाधिकाºयांच्या या पवित्र्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या कामासाठी हा निर्णय घेतला. त्यामध्ये कोणावर अन्याय करण्याचा उद्देश नसल्याचे म्हटले आहे.

ग्रामपंचायतींची कामेही घेतली हातात..ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन असल्याने ग्रामपंचायतींना कामाची यंत्रणा म्हणून देण्यात आलेली विकास कामे आता जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडून केली जाणार आहेत. काम करणाºया यंत्रणेत बदल करून तसे प्रशासकीय मंजुरी आदेश काढण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यकारी अभियंत्यांना बजावले आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे, तीर्थक्षेत्र विकास, अतिरिक्त विशेष अनुदानातील कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद