शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या कामांसाठी अधिकारी जाणार शेतावर !

By admin | Updated: August 27, 2015 23:56 IST

अपूर्ण कामे पूर्ण करणार; शेतक-यांच्या अडचणींचा निपटारा करणार असल्याचे जिल्हाधिका-यांची स्पष्टोक्ती.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आता जिल्हाधिकार्‍यांसह प्रमुख अधिकारी शेतावर जाऊन विहिरींच्या कामांची पाहणी करणार आहेत. अधिकारी शेतकर्‍यांसोबत चर्चा करून, कामातील अडचणींचा निपटारा करीत सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयोग राबविला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात; मात्र कामे सुरू झाल्यानंतर विविध कारणांमुळे ही कामे रखडली जातात. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्‍यांसह सर्व प्रमुख अधिकारी शेतात जाऊन सिंचन विहिरींच्या कामांची पाहणी करण्याचा प्रयोग अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी भेट देतील, कामांची पाहणी करतील. लाभार्थी शेतकर्‍यांसोबत अधिकारी चर्चा करतील आणि विहिरींची कामे अपूर्ण असल्याची कारणे समजून घेणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणी व समस्यांचा निपटारा अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. अकोला जिल्हाधिकार्‍यांच्या या प्रयोगाच्या संकल्पनेची दखल रोहयो सचिव व्ही. गिरीराज यांनी घेतली असून, असाच प्रयोग अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम व वर्धा या जिल्ह्यातही राबविण्याचे त्यांनी सुचविले आहे.

जिल्हाधिकारी, सीईओ आजपासून करणार विहिरींची पाहणी!

    अकोला जिल्ह्यात नरेगा अंतर्गत अपूर्ण सिंचन विहिरींच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह शुक्रवार, २८ ऑगस्टपासून पाहणी करतील. लाभार्थी शेतकर्‍यांसोबत चर्चा करून, सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांची कारणे जाणून घेतील, तसेच कामे पूर्ण करण्यासाठी अडचणींचा निपटारा करण्यात येणार आहे.

तालुका स्तरावर शेतक-यांच्या मुलाखती!

सिंचन विहिरींची कामे अपूर्ण असल्याची कारणे, अडचणी व त्यासंदर्भात लाभार्थी शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन, आवश्यक त्या उपाययोजना करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर संबंधित अधिकारी लाभार्थी शेतकर्‍यांच्या मुलाखती घेणार आहेत.