शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय दुर्दैवी

By admin | Published: November 14, 2014 12:44 AM

लोकमत परिचर्चेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे पुनर्गठण करण्याची संचालक व शेतक-यांची मागणी.

अकोला : कृषिउत्पन्न बाजार समित्या या शेतकर्‍यांचे आधारस्तंभ आहेत. या समित्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसोबतच इतर घटकांचेदेखील भरण-पोषण होते. अशा परिस्थितीत कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सुरळीत बाजार समित्या बरखास्त करण्यापेक्षा शासनाने या समित्यांच्या निवडणुका घेणे योग्य ठरेल, असे मत कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे संचालक व शेतकर्‍यांचे प्रतिनिधी यांनी गुरुवारी व्यक्त केले. लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीचा शासनाचा निर्णय कितपत योग्य आहे? या विषयावर संचालक व शेतकर्‍यांनी आपली मते मांडली. या परिचर्चेत अकोला कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे, विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर, हमाल-माथाडी कामगार संघटेनेचे शेख हसन कादरी, ग्रेन र्मचंट असोसिएशनचे उपाध्यक्ष ओमप्रकाश गोयनका, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्रीकांत खाडे आदी सहभागी झाले होते. प्रशासकीय अधिकार्‍यांनी बाजार समित्यांमध्ये सुरळीतपणा यावा आणि शेतकर्‍यांचे हित जोपासले जावे, यासाठी बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, नव्याने निवडणुका घेण्याचे सूचविले असल्याचे सांगितले. बाजार समित्यांच्या प्रतिनिधींनी कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्यानंतर आता शासनाने तात्काळ निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. येणारा काळ हा शेती हंगामाचा आहे. त्यांचा माल बाजारात येणार आहे. अशावेळी कृषिउत्पन्न बाजार समितीचे पुनर्गठण होणे गरजेचे आहे. प्रशासक नेमणे हा पर्याय असू शकत नाही. शासनाने कुठल्या कारणासाठी बाजार समित्या बरखास्त केल्या ते स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणीदेखील या प्रतिनिधींनी केली. शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. आता तात्काळ निवडणुका घेऊन चांगले लोकप्रतिनिधी बाजार समितीकरिता निवडून दिले पाहिजे. बाजार समितीला पर्याय निर्माण केला पाहिजे. शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय शासनाने घेऊन बाजार समित्यांचे पुनर्गठण करावे, असे मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केले.