शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

By admin | Updated: May 18, 2014 00:23 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता. मात्र, २00४ पासून पुन्हा भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे. २00९ मध्ये भाजपने हा गड राखल्यानंतर २0१४ मध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. तिरंगी लढतीत नेहमीच भाजपाला धार्मिक समीकरणाचा फायदा होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांनी मिळविलेला विजय मोदी लाटेचा परिणाम असला तरी धार्मिक समीकरणामुळे भाजपविरोधकांच्या मतांमध्ये झालेले विभाजनही धोत्रे यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. 

सत्ता आणि खासदाराचे गणित अखेर जुळले!

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेला खासदार आणि केंद्रातील सत्ता हे गणित १९८९ नंतर प्रथमच जुळले आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर दोन वेळा निवडून आले, त्यावेळी केंद्रात भाजपविरोधी सरकार आले होते. १९९६ मध्ये पुंडकर विजयी झाले. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकार १३ दिवसांमध्ये कोसळले होते. पुढे १९९८ आणि १९९९ मध्ये अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळविला, तेव्हा काँग्रेसविरोधी पक्षाची सत्ता आली. त्यानंतर २00४ आणि २00९ मध्ये संजय धोत्रे यांनी विजय मिळविला. त्यावेळीसुद्धा केंद्रात भाजपविरोधी पक्षाची सत्ता आली. यावेळी प्रथमच अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या खासदारांच्या पक्षाची दिल्लीत सत्ता आली आहे. मिळविला होता. त्यानंतर काँग्रेस आणि अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघामध्ये आघाडी झाल्यानंतर दोन वेळा भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. काँग्रेस आणि भारिप यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे २00४ आणि २00९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले होते. असे असतानाही भारिप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला त्यादिवशीच भाजपचा विजय निश्‍चित झाला होता. त्यातही काँग्रेसने अल्पसंख्याक समाजातील हिदायत पटेल यांना उमेदवारी दिल्याने आंबेडकर यांच्या मार्गात आणखी एका अडथळ्य़ाची भर पडली. सहकारक्षेत्राबाहेर कोणतीही वेगळी ओळख नसलेल्या हिदायत पटेल यांच्या पाठीशी अल्पसंख्याक समाज ताकदीने उभा राहिला तर आंबेडकर यांना दलितेतर मतांची मोट बांधण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेस आणि भारिप यांच्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन धोत्रे यांना फायदा होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच पावणे दोन लाख नवीन मतदार नव्याने जुळले होते. या मतदारांना काँग्रेसच्या परंपरेचे काही घेणे-देणे नसल्याने हा गट मोदी लाटेच्या प्रभावात आला. त्याचा फायदा धोत्रे यांना मिळाल्याने त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली. पक्षांतर्गत असंतोष, जनसामान्यांमध्ये न मिसळणारा खासदार आणि अकार्यक्षम असलेले लोकप्रतिनिधी, अशी सर्वसामान्यांमध्ये झालेली भावना, अशा प्रतिकूल परिस्थितीतही धोत्रे यांना मोठय़ा फरकाने मिळालेला विजय हा केवळ मोदी लाट आणि धार्मिक समीकरणं जुळून आल्यामुळेच शक्य झाला.