शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:30 AM

अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांनी घेतला बळीप्रशासनाला जाग येईना

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गत दोन दिवसांत झालेल्या अपघातात सात जण ठार  झाले आहेत, तर पातूर घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  यासोबतच विटांच्या मिनी ट्रकखाली येऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार  परिसरात शनिवारी घडली. सोमवारी दुपारी शिवणी विमानतळाजवळ झालेल्या अपघातात तीन जण  ठार झाले असून, बडनेराजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात नागपुरा तील चार जण जागेवरच ठार झाले आहेत. बोरगाव मंजूजवळ आल्टो कार व टँकरच्या अपघातात  नागपूर जिल्हय़ातील कन्हान येथील दोघे जण जागेवरच ठार झाले होते. अशा प्रकारे गत चार  दिवसांमध्ये चाहोट्टा बाजार, पातूर घाट, बोरगाव मंजू, लोणी व शिवणी विमानतळाजवळ झालेल्या  अपघातात ११ जण ठार झाले असून, पाचच्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी  रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या चाळणीमुळे अपघात वाढले!रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची माहिती  समोर आली आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांत झालेले अपघात हे  केवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे झाल्याचे वास्तव आहे. तसेच चोहोट्टा बाजार येथील अपघातही रस् त्यावरील खड्डे वाचविताना झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. यासोबतच पातूर घाटातील अपघा तालाही रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळेच या ११ जणांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम वभागाचे दावे फोलसार्वजनिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील पूर्ण रस्त्यांवरील खड्डे बुजविणार  असल्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आल्या होत्या; मात्र अकोला जिल्हय़ातील  परिस्थिती विदारक असून, एकाही रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला नसून, उलट १५  डिसेंबरनंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ११ जणांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी होत  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola cityअकोला शहरAccidentअपघात