शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट!

By admin | Updated: December 24, 2014 01:20 IST

कपाशीवर लाल्या, तुरीवर किडींचा हल्ला; हरभरा किडींनी केला फस्त.

मनोज भिवगडे /अकोलानापिकी आणि कर्जबारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. अल्पशा पावसामुळे खरिपाचे पीक हातातून गेलेल्या शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांकडे आशेने बघणे सुरू केले होते, मात्र किडीने रातोरात होत्याचे नव्हते करून शेतकर्‍यांना पुन्हा अडचणीत आणले आहे. कपाशीवर लाल्या आणि तुरीवर आलेल्या किडीपाठोपाठ बोनोसेफॅलम बीटल (काळ्य़ा म्हशी) या किडींनी हरभराही फस्त केला आहे. याचा सर्वाधिक फटका खारपाणपट्टय़ातील हजारो कोरडवाहू शेतकर्‍यांना बसला आहे. यंदाच्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. १0 सप्टेंबरपासून जिल्ह्यात पिकांसाठी आवश्यक पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन पेरणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. त्यापुढील ४0 दिवस पाऊस न झाल्यामुळे रब्बीचा पेराही खोळंबला. साधारणत: १५ ऑक्टोबरच्या सुमारास रब्बीतील हरभर्‍याची पेरणी केली जाते. पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. काहींनी धाडस करून कोरड्या जमिनीतच महागडे बियाणे टाकले, मात्र तेही उगवले नाही. त्यामुळे दुबार आणि त्यानंतर तिबार पेरणी करण्याचे संकट जिल्ह्यात शेतकर्‍यांवर कोसळले. त्यातही काही शेतकर्‍यांनी डिेझल पंपाच्या मदतीने आणि टॅक्टरवर पाणी शेतात नेऊन हरभरा, तूर, कपाशी या पिकांना पाणी दिले, मात्र हवामानातील बदलानंतर या पिकांवर किडींचा प्रादरुभाव झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तुरीचा फुलोर ढगाळ वातावरणामुळे गळला, तर कपाशीचे पीक लाल्या रोगामुळे नष्ट होणार्‍या मार्गावर आहे. लाल्या रोगाचा फटका मूर्तिजापूर तालुक्यासोबतच अकोला आणि आकोट तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना बसला. खारपाणपट्टय़ातील तुरीचा फुलोर मागील आठवड्यात गळल्यामुळे म्हैसांग, अंबिकापूर, दापुरा, कट्यार, मजलापूर आदी परिसरातील तुरीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.