शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:22 PM

370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसरकारच्या विरोधात शिवस्वराज्य यात्राकोल्हापूर, सांगलीचा परिसर महापुराने त्रस्त आहे.गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती कशी? कर्जमाफी द्यायला काय तीन वर्षे लागतात का ?370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच

शिर्डी: राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारच्या विरोधात शिवस्वराज्य यात्रा आहे. आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. शिवसेनेने अनेकदा भाजपावर टीका केली आहे. ‘तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना’ अशी भाजपा सेनेची अवस्था झाल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.शिर्डी येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीचा परिसर महापुराने त्रस्त आहे. सरकारचा भोंगळा कारभार यास कारणीभूत आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती कशी.? नियोजन नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वेळोवेळी माहिती घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. डोक्यावरून पाणी वाहायला लागल्यावर सरकार जागे झाले आहे.आज बेरोजगारीचं संकट दररोज वाढत आहे. भाजप सेनेच्या कालावधीत शेतकरी संपावर जात आहेत. जनतेला विश्वास देण्यात सरकार अपयशी आहे. युती सरकारने राज्याला कर्जबाजारी केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला काय तीन वर्षे लागतात का ? सांगली, कोल्हापूरची परिस्थिती सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे उद्भवली आहे. आता केवळ सरकार याचा सामना करू शकत नाही. सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची गरज आहे. सरकारने अनेकांच्या मागे चौकशा लावून धाक दाखवला आहे. आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून अनेक जण भाजपात जात आहेत.370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. सगळी परिस्थिती बघून पाऊल उचलणं गरजेचं आहे. अपयश झाकण्यासाठी भाजपाची महाजनादेश यात्रा असल्याचीही टीका पवार यांनी केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीAjit Pawarअजित पवार