शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुळा उजव्या कालव्यातून २० मार्चला आवर्तन सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 4:08 PM

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. पाणी वापर संस्थांनी लेखी मागणी केली नसतांनाही शेतक-यांच्या दबाव तंत्रामुळे पाटबंधारे खात्याला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी झुकावे लागले आहे. मुळा पाटबंधारे खात्याकडे केवळ चारच संस्थांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाटबंधारे खाते कालव्यातून पाणी सोडण्यास राजी नव्हते.  लेखी मागणी असल्याशिवाय पाणी सोडता येत नाही असा पाटबंधारे खात्याचा नियम आहे. मात्र नियम डावलून पाटबंधारे खात्याला मंत्र्यांच्या दबावापुढे झुकावे लागले आहे. डाव्या कालव्यातून ब्रिटीशकालीन पध्दतीचा अवलंब करून लेख मागणीनंतर पाणी सोडण्यात आले होते.  मात्र उजव्या कालव्याकडे लेखी मागणी नसल्याने पाटबंधारे खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.पाटबंधारे खात्याने पाणी सुटण्याचे प्रगटन मुदत १६ मार्च दिली होती. मात्र १६ मार्चपर्यंत केवळ १०० हेक्टरची मागणी नोंदविण्यात आली होती. पाणी वापर संस्थांनी ताठर भूमिका घेत लेखी मागणीकडे पाठ फिरविली. पाटबंधारे खाते व पाणी वापर संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. १९ मार्चपर्यंत कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणार आहे. रब्बी आवर्तन सोडण्यापूर्वीही दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र रेतीमुळे पुन्हा दुरूस्तीची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी हिरवा कंदील दाखविला होता. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय मंत्री शंकरराव गडाख व लोकप्रतिनिधी यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणDamधरणWaterपाणी